• Thu. Jul 23rd, 2026

    Sanjay Nirupam: दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच; संजय निरुपम यांची ठाकरे बंधूंच्या मनोमिलन चर्चेवर सडकून टीका

    Sanjay Nirupam: दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच; संजय निरुपम यांची ठाकरे बंधूंच्या मनोमिलन चर्चेवर सडकून टीका

    Sanjay Nirupam On Raj-Uddhav Thackeray : राजकीयदृष्ट्या संपलेल्या दोन्ही पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी रविवारी केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    sanjay nirupam2

    मुंबई : ‘महाराष्ट्रहिताच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील लोकांनी नाकारले आहे. उबाठा गट आणि मनसे दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते.

    व्यावसायिक भाषेत बोलायचे झाल्यास तोट्यातील दोन कंपन्या एकत्र आल्या तरी त्यातून नफ्यातील कंपनी निर्माण होत नाही. राजकीयदृष्ट्या संपलेल्या दोन्ही पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी हा प्रयत्न आहे,’ अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी रविवारी केली.
    Harshwardhan Sapkal : ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा
    निरुपम पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आणि सत्तेसाठी, कुटुंबासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि काँग्रेससोबत गेले. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. ते आता स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते, असे ते म्हणाले.
    Uddhav Thackeray: हिंदीची सक्ती उखडून फेकू! कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा
    ‘बाळासाहेबांच्या विचारांचे वारस शिंदेच’
    उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या रक्ताचे वारस असले तरी त्यांच्या विचारांचे खरे वारस एकनाथ शिंदेच आहेत, असेही निरुपम म्हणाले.
    एक्स्प्रेस वेवर अपघात घटले; मुंबई-पुणे मार्गावर पहिल्या तिमाहीत ७० टक्क्यांनी प्रमाण कमी, काय सांगतो अहवाल?
    ‘राज्याने नाकारल्याने एकीची भाषा’
    मुंबई :
    ‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यात महाराष्ट्राच्या हिताचा काय संबंध आहे, या दोघांनाही महाराष्ट्राने नाकारल्याने त्यांना एकत्र येण्याची गरज वाटत असेल,’ अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘ते जाऊ द्या, कामाचे बोला’, असे सांगत यावर भाष्य करण्याचे टाळले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed