• Fri. Mar 6th, 2026

    आमदार, मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न,मी आधुनिक अभिमन्यू..,जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे रामराजेंवर हल्लाबोल

    आमदार, मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न,मी आधुनिक अभिमन्यू..,जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे रामराजेंवर हल्लाबोल

    आमदार,मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. सर्व चक्रव्यूह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूर: आमदार,मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. सर्व चक्रव्यूह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. याद्वारे अप्रत्यक्षरित्या रामराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    सर्व चक्रव्युव्ह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार
    सांगोला तालुक्यात मंत्री गोरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले. सामान्य माणसांना स्वाभिमानाने उभा करणारा जयकुमार गोरे. प्रस्थापितांना ऐवढेच सांगायचे आहे. आमदार होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले २० वर्षापासून प्रयत्न करत आहेत. मंत्री होऊ नये म्हणून पण केले. मंत्री झाल्यानंतर अशी कळ उठली. आता सर्व गोष्टी करून बघितल्या पण जयकुमार गोरे कधी थांबला नाही. कधी थांबणार नाही. कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे आशीर्वाद आहेत. जर खरंच मर्द असाल तर मैदानात येऊन बघा. माझा पराभव करू शकले नाही. पक्षातली आणि पक्षाबाहेरची त्यांनी सर्व ताकद लावली. तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीसांचा पठ्ठ्या आहे. सर्व चक्रव्युव्ह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार.

    आमच्या इथे एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा
    आमच्या इथे एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे. आणि राजकारण हा सूड बुद्धीचा खेळ झाला आहे. ऐकमेकांवर सूड उगवण्याची पद्धत सुरू झाली आहे. पण सांगोल्याला अपवाद आहे. या तालुक्याला विचार आहे. आणि राजकारण कुठपर्यंत करायचे असते हेही माहिती आहे. आदरणीय गणपतराव देशमुख असतील किंवा शहाजी पाटील असतील इतर नेतेमंडळींनी या तालुक्याला आदर्श घालून दिला. निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांची गळाभेट घेणारे उमेदवार हे सांगोल्यातच असू शकतात.

    माण _खटाव , माळशिरस ,जत सांगोला सह आदी दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करण्याचे माझे स्वप्न असून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed