Latest Marathi News: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत आज, शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रावारी पहाटे सरकार नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करत गुन्हेगारांसाठी एक कठोर कायदा आणण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी एका विधेयकावर चर्चा करून संसदेत ते मंजूर केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. त्याच्या काही वेळा नंतरचं सोनम वांगचुक यांनी २६व्या दिवशी त्यांचं उपोषण सोडलं.
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
