वाढत्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबाही दिसेनासा झाल्याचे चित्र होते. इगतपुरीत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला, तर त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. पावसामुळे जिल्ह्यात दोन मृत्यू झाले असून, शंभराहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे कोसळली, झाडे उन्मळून पडली. गंगापूर धरण ९७ टक्क्यांवर गेल्याने विसर्ग वाढविण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात कादवा, दारणा, गिरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये वेळुंजे (२०३ मिमी), त्र्यंबक शहर (२२९ मिमी) आणि दहेवाडी (१४७) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सुरगाणा शहरात (२४३ मिमी) अतिवृष्टीची नोंद झाली.
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरण 95 टक्के भरले; इगतपुरीत 16 जणांचे रेस्क्यू
जलसंपदा विभागाने गुरुवारी सकाळी साडेनऊपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू केला. दुपारी दोनला १२ हजार ६०० क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. शहर परिसरातील पावसामुळे होळकर पुलाच्या भागातील विसर्ग दुपारी १९ हजार क्युसेकपर्यंत पोहोचला. धरणातील विसर्गामुळे आलेला हा पहिलाच पूर होता. सराफ बाजार, भांडीबाजारात पाणी शिरून लोकांचे हाल झाले. दरम्यान, रात्री उशिरा पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते.
तालुकानिहाय पाऊस
त्र्यंबकेश्वर १९३.३, सुरगाणा १६४.५, नाशिक ७३.४, पेठ ६६.५, कळवण ५०.७, कळवण ५०.७, बागलाण ४३.१, देवळा ३८.७, मालेगाव १३.२, नांदगाव ४.४, दिंडोरी ५३.७, इगतपुरी ५६.८, निफाड ३९.९, सिन्नर, २५.१, येवला १०.७, चांदवड २८.३ (आकडे मिलिमीटरमध्ये)
निरावी चहात ‘सपट’ नकोच! 121 वर्षांचा वारसा, ‘ट्रेडमार्क’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय
आज यलो अलर्ट
नाशिकमध्ये ताशी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळले. त्यामुळे घरांची पडझड झाली. औद्योगिक वसाहतींतील वीज खंडित झाल्याने उद्योगांचे नुकसान झाले. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज (दि. २४) यलो अलर्ट, तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला असून, शनिवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
असा सुरू आहे विसर्ग
१३,९३२ क्युसेक —गंगापूर धरण
१५४९८ क्युसेक —भावली धरण
१०९६५ क्युसेक —कडवा धरणा
५५,००० क्युसेक —नांदूरमध्यमेश्वर धरणv
आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी धोकेदायक ठिकाणी वा नदीकाठावर जाऊ नये. दवाखान्यांत पुरेसा औषधसाठा, सर्पदंश प्रतिबंधक लशीचा साठा ठेवण्यात आला आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
