• Fri. Mar 13th, 2026

    राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आरोप

    राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आरोप

    Raju Shetti: कारागृहांमध्ये एका वर्षांत रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

    महाराष्ट्र टाइम्स
    raju shetty1

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: राज्यातील कारागृहांमध्ये एका वर्षांत रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ‘तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

    राज्य सरकार राज्यातील कारागृहात कैद्यांच्या पालनपोषणासाठी वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करते. रेशन आणि उपाहारगृहांमधून कारागृहातील कैद्यासाठी गहू, तांदूळ, साखर, डाळी, दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, अंडी, बेकरी पदार्थ खरेदी केले जातात. ही खरेदी दर वाढवून करण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. यावेळी शेट्टी यांनी अन्नपदार्थांचे बाजारांतील दर आणि कारागृहाने खरेदी केलेले दर यांची जंत्री सादर करून हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला. या प्रसंगी ॲड. योगेश पांडे आणि बापू करंडे उपस्थित होते.
    पत्नी स्वप्नात येऊन छळते, माझ्या छातीवर बसते अन्…; शिस्तभंग कारवाईत कॉन्स्टेबलचे अजब उत्तर
    केंद्रीय पद्धतीने खरेदी करताना साहित्याचे दर वाढविलेले असून, मंत्रालय आणि इतर उपाहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरांमध्ये मोठा फरक आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी शेट्टी यांनी केली.
    भारत सरकारने पासपोर्टचे नियम बदलले; आता अर्ज करण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अनिवार्य, जाणून घ्या नवे बदल
    ‘शक्तिपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचा विरोध नाही. या रस्त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग चांगला असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग का बांधला जात आहे ? राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांकडे जाणारे रस्ते चांगले असताना ८०२ किलोमीटरच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या या रस्त्याची आवश्यकता काय,’ असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला.
    मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचे ते फोटो आधीच पाहिलेले का? देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले…
    शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता काय ?
    ‘शक्तिपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचा विरोध नाही. या रस्त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग चांगला असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग का बांधला जात आहे ? राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांकडे जाणारे रस्ते चांगले असताना ८०२ किलोमीटरच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या या रस्त्याची आवश्यकता काय,’ असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला.
    सिडकोला ‘अतिघाई’ महागात, विमानतळाभोवतीच्या जमीन संपादनावरुन न्यायालयाने फटकारले, नेमकं प्रकरण काय?
    राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरू आहे. तीन वर्षे ठिबक सिंचनसाठी पैसे नाहीत. विद्यार्थ्यांच्या तीन वर्षाच्या ३४०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे. -राजू शेट्टी

    राज्य सरकारच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत अधिकचे भाष्य करणे योग्य ठरणार नाही. – डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह विभाग

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed