• Fri. Jun 12th, 2026
    रेल्वेत ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’; पुणे-दिल्ली विशेष रेल्वेत प्रवासादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

    दिल्लीमध्ये होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास धावणाऱ्या पुणे-दिल्ली रेल्वेच्या प्रवासादरम्यान ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    pune to delhi train

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: दिल्लीमध्ये होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास धावणाऱ्या पुणे-दिल्ली रेल्वेच्या प्रवासादरम्यान ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरणार आहे. साहित्यरसिकांना पुण्यातून घेऊन जाणाऱ्या या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत.

    राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’चे स्वागताध्यक्ष असून, तेही ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ सहभागी होऊन, रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. रेल्वेमध्ये होणारे हे पहिलेच मराठी संमेलन ठरणार आहे, अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. लेखक शरद तांदळे, वंदेमातरम्‌ संघटनेचे अध्यक्ष वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.
    इगतपुरीत आलिशान जुगार अड्डा उद्ध्वस्त! १८ संशयितांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
    सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे होत आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारीला दुपारी पुण्यातून निघणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री दिल्लीत पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ रंगणार आहे, असे नहार यांनी सांगितले.
    स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
    शरद तांदळे साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष, तर वैभव वाघ संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
    तुमच्याकडे परिवारवाद, तर आमचा महाराष्ट्रवाद! एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतून ठाकरेंवर टीका
    संमेलनाची वैशिष्ट्ये…
    ■ विविध गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, एकपात्री कलाकार, समाज माध्यमांवरील कलाकार, शाहीर, भजनी मंडळे या संमेलनात सहभागी होणार आहेत.
    ■ रेल्वे स्टेशन आवारात पुस्तक दिंडीचे आयोजन.
    ■ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने प्रवासाला सुरुवात.
    ■ जळगाव आणि ग्वाल्हेर येथे रेल्वेचे विशेष स्वागत.
    ■ संपूर्ण प्रवासात साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
    ■ साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार.
    ■ दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदनाने समारोप.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed