• Sun. Jun 14th, 2026
    CJP Abhijeet Dipke: …तर मोदींचा राजीनामा घेऊ! ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांचा सरकारला इशारा

    CJP Abhijeet Dipke: शनिवारपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचेही दीपके यांनी सांगितले.

    सीजेपी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: नीट, ‘सीयुईटी’, ‘सीबीएसई’च्या परीक्षा देणाऱ्या एक कोटी विद्यार्थ्यांचे पेपरफुटीमुळे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी सत्ताधारी खुर्चीला चिटकून बसले आहेत. आपल्या पंतप्रधानांना एक कोटी विद्यार्थी महत्त्वाचे, की काम न करणारा एक मंत्री, याचा निर्णय घ्यायचा आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेतल्यास पंतप्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी दिला.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘सीजेपी’च्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे, राहुल डंबाळे यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

    VIDEO | कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार ,पुण्यातून दीपकेंचा थेट इशारा

    दीपके म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांपासून भारतात ‘हिंदु-मुस्लिम’ या विषयावर राजकारण केले जात आहे. धार्मिक धुर्वीकरणातून रोजगार, महागाई, शिक्षण असे प्रश्नच नागरिकांना पडू नयेत, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. जग हे ‘एआय’, क्वांटम कॉम्युटिंग, सेमीकंडक्टरकडे जात असताना भारतात हिंदू-मुस्लिम केले जात आहेत. देशाची व्यवस्था सडली असल्याने कॉकरोच एकत्रित आले असून, ती नीट करण्यासाठी कॉकरोचची गरज आहे.’

    ‘माध्यमस्वातंत्र्यावर बोलावे’
    ‘पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये माध्यम स्वातंत्र्यावर बोलले पाहिजे. कोणत्याही सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणारे सरकार आपल्याला हवे आहे. सत्य आणि अहिंसा हाच आमच्या आंदोलनाचा मार्ग आहे.’, अशी अपेक्षा वांगचुक यांनी व्यक्त केली.

    Maharashtra Timesविधान परिषद निवडणुकीत ‘मॅचफिक्सिंग’? पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप
    मुख्यमंत्र्यांना टोला

    ‘आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजक पसरवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. मला त्यांना विचारायचे आहे, की हक्कासाठी लढणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजक पसरवणे आहे का? आम्हाला राज्यघटना माहीत आहे का, असेही ते विचारतात. मात्र, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या राज्यघटनेत लिहिले आहे,’ असा टोलाही दीपके यांनी लगावला.

    आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
    -पेपरफुटी झाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून १० हजारांची भरपाई
    -भरती प्रक्रियेदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था
    -पेपरफुटीनंतर ७२ तासांच्या आत पर्यायी परीक्षेची तारीख जाहीर करणे
    -उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासणी आणि टेंडर घेणाऱ्या परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा