मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आर्थिक व प्रशासकीय मागण्यांचा पाढा वाचला. त्यावेळी महागाई भत्ता ५३वरून ५८ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यास, एसटी कर्मचाऱ्यांनाही तशी वाढ तत्काळ लागू करण्याचे आदेशही सरनाईक यांनी प्रशासनाला दिले.
NCP Party 27th Foundation Day : तटकरे-भुजबळ यांच्यात शाब्दिक जुगलबंदी, वर्धापन दिनाच्या भाषणात टोले अन् टोमणे
वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानकांचा विकास, कल्याणकारी योजना आणि महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. कर्मचारी संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करून उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह होणाऱ्या स्वतंत्र बैठकीत उर्वरित आर्थिक मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. त्याचवेळी घरभाडे भत्त्याची थकबाकीही लवकरच देण्यात येईल. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे’, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
Kumbhar Samaj Schemes : कुंभार समाजासाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण आदेश; 700 ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ, नव्या सवलतींचा वर्षाव
एनसीएमसी कार्ड बंधनकारक
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
अशा आहेत मागण्या…
-एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन
-महागाई भत्त्याची २०१८ पासूनची थकबाकी
-कॅशलेस मेडिक्लेम, कंत्राटी भरती बंद करणे
-एसटीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद
-स्वमालकीच्या ई-बस गाड्यांची खरेदी