• Fri. Jun 19th, 2026
    ST Bus Employees DA Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा; किती टक्क्यांची वाढ अन् कधीपासून लागू होणार?

    ST Bus Employees Increase DA Allowance : एसटी बस परिवहन महामंडळाने चालक आणि वाहक यांना दणका दिला आहे. प्रशासनाने सांगितलेल्या हॉटेवर बस न थांबवता दुसऱ्या हॉटेलवर बस थांबवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

    एसटी बस कर्मचारी महागाई भत्ता वाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करताना कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातदेखील वाढ करण्याचा निर्णय सरनाईक यांनी जाहीर केला. याचा लाभ एसटीतील ८६ हजार कर्मचाऱ्यांना होणार असून, त्याची अंमलबजावणी जूनपासून करण्यात येणार आहे.

    महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ

    मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ येथे महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. त्या वेळी सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचे घोषित केले. भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला देताना सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना; तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
    Maharashtra TimesWeather Update: मुंबईत १० वर्षांमधील सर्वाधिक तापमान, पुण्यातही पावसाचं आगमन लांबणीवरच; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल

    ‘बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढीवर झाला असून, ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल’, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

    नेमून दिलेल्या हॉटेलांवर एसटी न थांबल्यास दंड

    दरम्यान, एसटीच्या भरारी पथकाने महामार्गावरील एसटी महामंडळाने नेमून न दिलेल्या हॉटेलांवर बस उभ्या करणाऱ्या १३१ बसवर कारवाई केली आहे. दोन महिन्यांत केलेल्या या कारवाईतील एसटी बस राज्याच्या विविध भागांतील आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल केले जाणार आहेत.
    Maharashtra TimesSunetra Pawar: सुनेत्रा पवारांची ‘दादा’ स्टाइल; राष्ट्रवादीतील दिग्गजांना स्टेजवरूनच फटकारलं, नाव न घेता बरंच काही बोलून गेल्या!

    चालकांवर कारवाईचा इशारा

    एसटीचालक महामार्गावर कोणत्याही हॉटेलवर थांबून फक्त स्वतःचाच फायदा पाहत होते. हॉटेल चालकाकडून प्रवाशांची लुटमार करण्यात येत होती. अशा तक्रारी वाढल्यानंतर एसटी प्रशासनाने प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेलची नेमणूक केली. त्यांना प्रवाशांकडून नाश्ता, जेवणासाठीचे दर निश्चित करून दिले; तसेच त्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही चालकांकडून फायद्यासाठी परवानगी नसलेल्या हॉटेलवर बस उभ्या केल्या जात आहेत. अशा बसवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे विभागाची सहा पथके कार्यरत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा