बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत भेट घेतली.
‘मी जवळपास अर्धा तास अजित पवारांना भेटले. झालेला प्रकार माणुसकीला काळिमा फासणार असल्याचं ते म्हणाले. त्यावर मी त्यांना मग तुम्ही धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही, असा प्रश्न केला. उद्या दुपारी १२ वाजता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे. त्यावेळी आम्ही तुम्ही दिलेल्या सर्व कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर चर्चा करु. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याबद्दल आम्ही पुढील निर्णय घेऊ, असं अजित पवारांनी सांगितलं,’ अशी माहिती दमानिया यांनी दिली. त्यामुळे उद्या कोणता निर्णय घेतला जाणार याबद्दल उत्सुकता आहे.
तटकरेंना फिरु देणार नाही! सेना आमदाराचा इशारा; शिंदेसाहेब, थ्री इडियट्सना आवरा! NCPचा पलटवार
‘देशमुख यांच्या हत्येशी संबंधित अनेक पुरावे मी अजित पवारांना दिले. धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराड यांचे अनेक व्यवसाय एकत्र आहेत. त्यांच्या कंपन्यांमधून कसा आर्थिक नफा मिळतो. हे सगळं ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये कसं बसतं, हे मी अजित पवारांच्या कानावर घातलं आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे,’ असं दमानियांनी सांगितलं.
भोजपुरी, तमिळ, कन्नड भाषेत समालोचन होतं, मग मराठीत का नाही? हॉटस्टारनं मनसेला कारण सांगितलं
‘देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली. त्याबद्दल जनमानसात संताप, आक्रोश आहे. त्यामुळेच मी या प्रकरणात लढा देत आहे. संतोष देशमुख यांच्यासोबत जो प्रकार घडला, तसा प्रकार भविष्यात अन्य कोणासोबत घडू नये. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून सगळी कागदपत्रं दाखवू आणि मग योग्य निर्णय एकत्रितपणे घेऊ, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे,’ अशी माहिती दमानियांनी दिली.

