• Fri. Mar 6th, 2026
    नशिबात असावं लागतं हो! विजय शिवतारेंनी थेट अजित दादांना खिजवलं, कपाळाकडे बोट दाखवत म्हणाले…

    Vijay Shivtare on Ajit Pawar : मुख्यमंत्रिपद नशिबात असायला हवं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांवरील प्रश्नावर शिवतारे यांनी दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनेकडून पुन्हा निवडून आलेले आमदार विजय शिवतारे यांच्यातील विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजितदादांनी ‘तू कसा निवडून येतोस हेच पाहतो’ असं म्हणत शिवतारेंना उघड आव्हान दिलं होतं. यथावकाश शिवतारे बापू पडलेही. मात्र आधी महाविकास आघाडीत आणि नंतर महायुतीत मांडीला मांडी लावून बसताना दोघांमध्ये वारंवार खटकेही उडाले. अगदी बंडखोरी करुन बारामतीत अजित पवारांच्या पत्नीला आव्हान देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला होता. आताही महायुतीत एकत्र असताना शिवतारेंनी अजितदादांना टोला हाणला आहे. मुख्यमंत्रिपद नशिबात असायला हवं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांवरील प्रश्नावर शिवतारे यांनी दिली.

    विजय शिवतारे काय म्हणाले?

    एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, जे निर्णय वरिष्ठ घेतील, त्यानुसार वागणे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. राहता राहिला अजित पवारांचा विषय, तर प्रत्येक पक्षाच्या आमदार आणि नेत्यांना वाटत असतं, की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा, पण ते (कपाळाकडे बोट दाखवत) इथे असायला हवं, असं म्हणत मुख्यमंत्रिपद नशिबी असायला हवं, असं शिवतारेंनी अप्रत्यक्षपणे सुचवलं. टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
    Uddhav Thackeray : सपा-काँग्रेस कशाला हवे, आपणच मुस्लिम उमेदवार देऊ ना; ठाकरे गटात स्वबळाचा नारा वाढला
    विजय शिवतारे यांनी बंड पुकारत बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. येथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात रिंगणात उतरल्या होत्या. परंतु शिवतारेंच्या बंडामुळे महायुतीत फूट पडून बारामतीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.

    Eknath Shinde : मुख्यमंत्रिपद सोडलं, ‘उप’साठीही अनुत्सुक, एकनाथ शिंदेंना काय मिळणार? अनोख्या डीलची चर्चा

    पुरंदरचा ‘तह’ अन् बारामतीतील बंड

    महायुतीची मतं विजय शिवतारेंकडे वळून पत्नीला धोका निर्माण होण्याची शक्यता अजित दादांनी हेरली. त्यातच २०१९ विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्याची पार्श्वभूमीही होती. त्यामुळे शिवतारेंची हरतऱ्हेने समजूत घालत त्यांचं बंड शमवण्यात अखेर महायुतीच्या नेत्यांना यश आलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून पुरंदर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *