• Sat. Sep 21st, 2024
आघाडीत बिघाडी? ठाकरेंकडील परभणीत मित्रपक्षाकडून थेट उमेदवाराची घोषणा, संजय जाधवांना धाकधूक?

मुंबई/परभणी : इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकपने महाराष्ट्रातून उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाकपने परस्पर तिकीट जाहीर करुन महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदाराच्या मतदारसंघातच भाकपने शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ठाकरेंना ती जागा टिकवण्यात अडसर येतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून लोकसभा निवडणुकांसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडूतील तिरुप्पुर येथून कॉम्रेड के सुब्बरायन, नागपट्टीनाम येथून कॉम्रेड व्ही सेल्वराज, तर महाराष्ट्रातील परभणी लोकसभा मतदारसंघातून कॉम्रेड राजेंद्र रामचंद्र क्षीरसागर यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी २०१९ मध्येही परभणीतून लोकसभा लढवली होती.
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?
परभणी लोकसभा मतदारसंघातून सध्या संजय जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. जाधव हे २०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळा परभणी लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले आहेत. त्यामुळे सलग विजयाची हॅट्ट्रिक साकारण्यास ते उत्सुक आहेत. परंतु इंडिया आघाडीतील भाकपने उमेदवारी जाहीर केल्याचा फटका त्यांना बसणार का, हा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. परंतु निष्ठावान राहिलेल्या जाधवांना पुन्हा तिकीट मिळणं साहजिक मानलं जातं.
उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदाराने साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेतून थेट लोकसभेचं तिकीट?
१९९९ पासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेने येथून संजय जाधव यांना तिकीट दिले होते आणि ते विजयी झाले होते. २००४ मध्ये तुकाराम रेंगे पाटील, २००९ मध्ये गणेशराव दुधगावकर आणि २०१४ आणि २०१९ मध्ये संजय जाधव पुन्हा खासदार झाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय जाधव ५ लाख ३८ हजार २१४ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश उत्तमराव विटेकर यांचा पराभव केला होता. ४१ हजार ८४२ च्या मताधिक्याने ते विजयी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed