काँग्रेसचे आमदार भाजप सोबत जाणार यात तथ्य नाही
आज दुपारच्या सुमारास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा राजीनामा दिला. यामुळे आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस मध्ये देखील राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे काँग्रेस मधील आणखी काही नेते भाजपच्या गळाला लागतील का असे चर्चा राज्य सुरू आहे. मात्र मी सकाळपासून २० ते २२ आमदारांशी बोललो आहे. राज्यातील कोणतेही काँग्रेस आमदार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही. यामुळे सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. राज्यात काँग्रेसला चांगलं वातावरण असल्याने आपण एकत्र येऊन लढू असं आमदारांचे म्हणणे असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे आला. त्यामुळे कुठतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. आम्ही एकत्र राहिल्यानंतर महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याने महायुतीचा कारभार लोकांना आवडलेला नाही हे सर्व्हेतून समोर आल आहे. राज्याच्या जनतेचा मूड महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. अशोक चव्हाण जरी गेले असले तरी दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते हा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाणार आहोत, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
जनता महाविकास आघाडीला कौल देईल
राज्यातील जनतेचा कल पाहता या सगळ्या घटना घडल्यानंतर कोणत्याच निवडणुका झाल्या नाहीत, नागरिक निवडणुकीत आम्हाला कौल देतील आता काँग्रेस म्हणून आम्ही एकसंध राहणार आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उर्वरित काँग्रेसला जनतेचा कौल देईल असा ठाम विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.