• Sat. Sep 21st, 2024
सोलापूरचे मीलेट सेंटर बारामतीला? सर्वपक्षीय नेते अजित पवारांवर नाराज, भाजप आमदार आक्रमक

सोलापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले मीलेट सेंटर अर्थात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आले आहे. अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला आहे,अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून येत आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी,ठाकरे गटाचे महेश धाराशिवकर,भाजप आमदार सुभाष देशमुख,शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेअगोदर सत्ताधाऱ्यां विरोधात सोलापुरात संतापाची लाट उसळली आहे. मीलेट सेंटर बारामतीला जाणार असल्याचे राज्य सरकारने शनिवारी जाहीर केले. तेलंगणा, मध्यप्रदेशातील निवडणुकीत व्यस्त असलेल्या भाजप, काँग्रेसच्या आमदारांना शनिवारी या निर्णयाची भणकही नव्हती.

शेतकऱ्यांना मोठा फटका

संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महाराष्ट्र श्री अभियान राबविण्याची घोषणा केली. तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देणे व इतर विविध कामांसाठी सोलापूर जिल्ह्यात श्री अन्न उत्कृष्टता स्थापन करण्याची सूचना केली होती. दरम्यान, सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितला
भाजप आमदार सुभाष देशमुखांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली

भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी मी या केंद्रासाठी होटगी स्टेशन येथे तातडीने काम सुरू करावे या मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले होते. केवळ सत्तेत आहोत म्हणून अजितदादांनी बारामतीला हे केंद्र घेऊन जाणे बरोबर नाही. आमचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. हे होऊ देणार नाही. जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांना बोललो आहे. मला राजीनामा द्यायची वेळ आली तर देईन, पण हे केंद्र सोलापुरातून जाऊ देणार नाही. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

आकडेवारी, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भाचे दाखले, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
सोलापूरचा स्मार्ट प्रकल्प पळविलेला नाही: अजित पवार

स्मार्ट प्रकल्पांतर्गत मिलेट व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट अॅण्ड कपॅसिटी बिल्डींग या योजनेचे एक फूड इन्क्युबेशन सेंटर अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इथे निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु सोलापूरकरांचा यासंबंधी गैरसमज निर्माण झाला असून त्यांचा प्रकल्प बारामतीला पळविला गेला असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक सोलापूरसाठी मंजूर प्रकल्प तेथेच होणार असून बारामतीच्या प्रकल्पाशी त्याचा संबंध नाही, आम्ही कोणाचाही प्रकल्प पळविलेला नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

डेंग्यू आजारातून बरं झाल्यावर अजित पवारांचा पहिलाच जनता दरबार, बारामतीकरांची मोठी गर्दी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed