• Sun. Aug 2nd, 2026
    Onion Procurement: केंद्राकडून ‘यूआरएस’ कांदा खरेदी बंद; नाशिकसह राज्यभरात शेतकरी आक्रमक

    Onion Procurement : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात साठवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने यूआरएस कांद्याची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

    कांदा खरेदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, नाशिक: केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या धोरणात अचानक बदल करीत यूआरएस श्रेणीच्या कांद्याची खरेदी ३० जुलैपासून पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्हा आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या नव्या निर्णयानुसार आता केवळ ‘अ’ श्रेणीच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याचीच खरेदी केली जाणार आहे.

    यासोबतच सरकारने किंमत स्थिरता निधीअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचा दर प्रतिक्विंटल दोन हजार ३३५ रुपये, असा सुधारित केला आहे. नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ या दोन्ही केंद्रीय खरेदी संस्थांना २५ मेपासून महाराष्ट्रात पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या संस्थांनी चांगल्या कांद्यासोबतच यूआरएस म्हणजेच लहान आणि काहीसा डागी स्वरूपाचा कांदाही खरेदी केला होता. मात्र, आता अचानक ही खरेदी थांबवण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
    Maharashtra TimesNashik Trimbakeshwar Temple: ऑनलाइन देव, ऑफलाइन धक्का! त्र्यंबकमध्ये 2100च्या अधिकृत अभिषेकाला 21 रुपयांचे ‘डिजिटल दर्शन’
    ठळक मुद्दे
    -केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून यूआरएस श्रेणीतील कांदा खरेदी ३० जुलैपासून बंद
    -आता केवळ अ श्रेणीचाच कांदा प्रतिक्विंटल दोन हजार ३३५ रुपये या दराने खरेदी केला जाणार
    -‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ मार्फत आधी घेतलेला युआरएस कांदा अचानक नाकारल्याने वाद
    -साठवणुकीच्या काळात कांदा खराब होत असताना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
    -शेतकरी आणि विविध संघटनांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध
    Maharashtra Timesयंत्रणा थंड, ‘जंक फूड’ उदंड! नाशकात शालेय परिसरात राजरोस विक्री; FDAचा आदेश कागदावरच
    परराज्यातील कांदा खपविण्याचा प्रयत्न
    चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे परराज्यातून आणलेला निकृष्ट दर्जाचा कांदा नाफेड खरेदी केंद्रावर खपविण्याचा प्रयत्न उघडकीस आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या आदेशाने महसूल, कृषी विभाग व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त पथकाने गुरुवारी रात्री शेडवर धाड टाकली. विश्वजित शाहू यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये इंदोर येथून आणलेला १० ते २० मिमी आकाराचा चिंगळी व गोल्टी कांदा आढळला. धुळे येथील संजयकुमार बाबूलाल अग्रवाल यांनी कांदा इंदोरहून आणल्याचे मान्य केले. पथकाने सुमारे ६०० क्विंटल कांदा जप्त केला असून, नायलॉन बारदान पिशव्याही आढळल्या. स्थानिक शेतकऱ्यांचा माल डावलून बाहेरील हलका कांदा घुसविला जात असल्याचा आरोप आहे. तहसीलदारांनी नाफेडला सखोल चौकशी व कारवाईचे निर्देश दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा