• Sat. Sep 21st, 2024
नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत वाचून दाखवा, आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे कडाडले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काल कठोर पाऊल उचललं. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल दिले. यावर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व आणि महत्त्व यापुढे काय असणार, आपल्या देशात लोकशाही टिकणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवाद म्हणजे ट्रिब्युनल जर आपल्या मस्तीने आणि मर्जीने वागू लागले, तर देशात कठीण होऊन जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मी अजून निकाल वाचला नाही, पण असं माझ्या कानावर आलं आहे, त्यामुळे तुम्हाला नार्वेकर कुठे भेटले, तर या निकालाची कॉपी तुम्ही त्यांना द्या किंवा वाचून दाखवा” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन

अनिल परब यांनी निकाल वाचला

यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थोडक्यात सांगितला. “शिवसेनेच्या ज्या याचिका होत्या, त्याबाबत विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करायचं होतं. त्यांनी प्रतिज्ञापत्र देत फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचं टाईमटेबल मांडलं. त्यासाठी कारण दिलं दिवाळीची सुट्टी आणि हिवाळी अधिवेशन. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत सांगितलं, की एवढे दिवस थांबण्याची गरज नाही.” असं परब म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटातून तिसरा राजीनामा, छत्रपती संभाजीनगरमधील नेत्याने आमदारकी सोडली
“दिवाळी आणि अधिवेशनाचे दिवस वगळले, तरी हातात एक महिना शिल्लक राहतो. त्यामुळे त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घ्यावाच लागेल, हा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ठेवण्यात आली आहे. जर अंतिम निवाडा केला नाही तर तो कोर्टाचा अवमान मानला जाईल, आणि त्याची तीव्र दखल घेतली जाईल” असंही अनिल परब म्हणाले.

आमदार अपात्रता प्रकरणी आजच्या सुनावणीत काय झालं?, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया!

“न्याय देण्याची परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. त्यामुळे सरत्या वर्षासोबत अपात्र सरकारला निरोप देऊ असा विश्वास आहे” असं यावर उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed