• Sat. Sep 21st, 2024

Kaas : कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला पण कोट्यवधी रुपये जमा, यंदा लाखभर पर्यटकांची भेट

Kaas : कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला पण कोट्यवधी रुपये जमा, यंदा लाखभर पर्यटकांची भेट

सातारा : जागतिक वारसा स्थान असलेल्या कास पठारावर यंदा निसर्गकृपा चांगली झाल्याने गतवर्षी पेक्षा जास्त फुले बहरली होती. पर्यटकांची संख्या ही दुप्पट झाल्याने कासवर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही चांगला बहर पाहावयास मिळाला. या हंगामात एक लाख पर्यटक फुलं पाहण्यासाठी आले तर दीड कोटींचा महसूल जमा झाला आहे.

यावर्षी ३ सप्टेंबरला अधिकृत हंगाम सुरू झाला होता. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. यावर्षी सप्टेंबरनंतरच फुले चांगली बहरल्याने ऑनलाईनची तीन हजार तिकीट विकेंडला क्षणात संपत होती. तिकीट न मिळाल्याने अनेक जण थेट येत असल्याने शनिवार रविवार प्रचंड गर्दी होवून वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत होती. यावर्षी पठारावरील तारेची कुंपण हटवल्याने पठारावर वेगवेगळ्या प्रजाती चांगल्या प्रकारे बहरल्या होत्या.

यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी गेंद, तेरडा, सितेची आसवे, सोणकी, मिकी माऊस, चवर यांचे गालिच्छे पाहावयास मिळाले. टोपली कारवी ही यावर्षी बहरल्याचे पाहावयास मिळाले. यावर्षी यातील किटकभक्षी ड्राॅसेरा इंडिका, बर्मानी, कंदीलपुष्प, आभाळी, नभाळी, आमरी, सातारेन्सीस, टूथब्रश अशी फुले ही चांगली होती.

कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगपासून कास पठारावर आणण्यासाठी खाजगी बसची सुविधा करण्यात आली होती. गर्दीच्या दिवशी तब्बल १० बसेस उपलब्ध केल्या होत्या. त्याच्या माध्यमातून पर्यटकांना कास पुष्प पठारावर फुले पाहण्यासाठी आणले जात होते. इतर वेळी दोन बसेसच्या माध्यमातून पर्यटकांना कास पठारावर आणत होते.

गतवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती, यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता, पण यावर्षी पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याबरोबरच महसूलही दीड कोटींच्या पुढे गेला मिळाला आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा;जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी, म्हणाले..
दोन महिने चालणार हंगाम सव्वा महिनेच चालल्याने शेवटच्या टप्प्यात येणारांची निराशा तर अनेकांना हंगाम संपल्याने येता आले नाही. स्थानिक व्यवसायिकांना हंगाम कालावधी कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागले. हंगाम ३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत फक्त सव्वा महिनेच चालला. यामध्ये शनिवार, रविवार प्रचंड गर्दी होवून अनेकांची गैरसोय झाली. ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने फुलांनी लवकर निरोप घेतला.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज रस्त्यावर उतरेल,रामदास तडस यांचा इशारा,मनोज जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य
यंदाचा हंगाम चांगला फुलला होता, मात्र दोन महिन्यात चालणारा हंगाम दीडच महिने चालला. यामुळे स्थानिक लोकांना दीड महिने रोजगार उपलब्ध झाला. बारमाही पर्यटन होण्यासाठी परिसरातील नैसर्गिकस्थळांची पाहणी करून नवीन पाॅइंट विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, कास समितीचे माजी अध्यक्ष दत्ता किर्दत यांनी सांगितले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत कमालाची गुप्तता, कारण…

दीड महिन्यापासून बंद असलेला जेजुरी मंदिराचा गाभारा खुला, दर्शनासाठी भक्तांची गर्दी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed