Marathi News Live: एकीकडे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी उकाडा असह्य होत असतानाच गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ५९ हजार १२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २४ जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन केंद्र मध्यवर्ती सभागृह क्रमांक-५मध्ये ११ एप्रिलच्या रात्री झालेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या सेवनाचा ओव्हरडोस होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नेस्कोच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
