Central Railway: मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कळवा ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं असून लवकरच कळवा ते ऐरोली रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे: कल्याण-कसाराच्या दिशेने राहणारे अनेक नागरिक नवी मुंबईला दररोज प्रवास करतात. यावेळी त्यांना ठाण्याहून ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेल किंवा वाशीला जाणाऱ्या लोकलने प्रवास करावा लागतो. या मार्गवर प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांची दररोज होरपळ होते. त्यात सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकावरून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल पकडताना तर अक्षरशः फरफट होते. पण आता या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 10 वर्षांपासून रखडलेल्या कळवा-ऐरोली रेल कॉरिडोरचं काम अखेर सुरु झालं आहे.
अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू
मध्य रेल्वेने कळवा ते ऐरोली या आठ किलोमीटर लांब रेल्वे मार्गाचं काम हाती घेतलं आहे. यामुळे नवी मुंबई आणि कल्याणमध्ये थेट जोडणी निर्माण होणार आहे. या नव्या उपनगरिय रेल्वे कॉरिडोरमुळे ट्रान्स हार्बरवरील लोकल ठाणे स्थानकाऐवजी थेट पुढे प्रवास करू शकतील. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील भार कमी होऊन गर्दीही कमी होणार आहे. या कामासाठी रेल्वे मार्गावर अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु केलं आहे. मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात 150 झोपड्या हटवल्या आहेत.
Aqua Lineवर मिळणार ‘मोबाइल नेटवर्क’! भुयारी मेट्रोच्या 16 स्थानकांत सेवा सुरू; उर्वरित स्थानकांतही काम प्रगतिपथावर
कळवा ते ऐरोली मार्ग कसा असेल?
कळवा ते ऐरोली रेल्वे मार्गाचं काम दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. पहिल्या टप्प्यात दिघे गाव स्टेशन बांधण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्गाचं काम सुरू करणार आहेत. या आठ किलोमीटर लांब मार्गापैकी 3.3 किमी मार्ग उन्नत रेल लिंक असेल. वाशी आणि बेलापूरवरून येणाऱ्या लोकल थेट कल्याणच्या दिशेने प्रवास करू शकतील. या मार्गावरी दिघा रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झालं असून या स्थानकावर प्रवासही सुरु झाला आहे.
उन्नत कळवा रेल्वे स्थानक
या कॉरिडोरवरील उन्नत रेल मार्गावर बॅलेस्टलेस ट्रॅक, प्लॅफॉर्म, तिकीट बुकिंग ऑफिस, पादचारी पूल आणि जिन्यांसह उन्नत कळवा स्थानकाचं बांधकाम करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कळवा ते दिवा या स्थानकांदरम्यान सर्वाधिक अपघात होतात. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत.या मार्गावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळवा ते ऐरोली रेल मार्ग विकसित करणं महत्त्वाचं असेल.
ST Bus: खिशात NCMC कार्ड नसलं तर सवलत नाही! एसटी प्रवासात सवलतीसाठी 1 ऑगस्टपासून बंधनकारक; कुठे-कसं मिळणार?
ठाणे आणि कळव्यादरम्यान अतिक्रमण हटवणं या कॉरिडोरच्या बांधकामातील सर्वात महत्त्वाचं काम होतं. आता कळवा ते ऐरोली कॉरिडोरचा मार्ग मोकळा झाला आहे अशी महिती मिड डेच्या वृत्तातून मिळाली आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांना कल्याणवरून नवी मुंबईला जाताना ठाण्यावरून लोकल बदलून प्रवास करावा लागतो. पण कळवा ते ऐरोली मार्गामुळे ही चिंता मिटणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा