• Sat. Sep 21st, 2024

मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाची धग वाढली, अजित पवार बारामतीत गावबंदीचा तट भेदणार?

मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाची धग वाढली, अजित पवार बारामतीत गावबंदीचा तट भेदणार?

टीम मटा, पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीला बळ देतानाच राजकीय नेत्यांविरोधात गावबंदीचे तट अधिकच भक्कम होऊ लागले आहेत. याचा फटका अजित पवार, रोहित पवारांपासून अनेक ज्येष्ठ नेत्यांना बसला आहे. मराठवाड्यातही सर्वत्र गावबंदीचे फलक झळकू लागले आहेत.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७व्या गळित हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, शनिवारी होणार आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने पवार यांना कारखान्यात येण्यास विरोध केला असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कारखान्यात कोणतेही कार्यक्रम पवार यांच्या हस्ते घेऊ नयेत’, अशा मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना देण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, त्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करत आहे’, असे पवार यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातही राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असताना गुरुवारी रात्री एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाची नुसती शपथ घेण्यापेक्षा मार्ग दाखवा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

जिल्ह्यात ५५० गावांत प्रवेशबंदी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ५५० गावांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकही संबंधित गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येत असल्याची माहिती सकल मराठा समाजाने शुक्रवारी दिली.

‘समितीला मुदतवाढ मान्य नाही’

‘राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. आरक्षणाची प्रक्रिया होणार नव्हती, तर सरकारने मुदत घेणे योग्य नव्हते. पुरावे मिळूनही सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नाही. राज्य सरकारने न्या. शिंदे समितीला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ आम्हाला मान्य नाही. आणखी दहा वर्षे मुदत दिली तरी त्यांना वेळ कमीच पडणार आहे. आम्हाला समितीही मान्य नसून सरकारने वेळ मागून आमची फसवणूक केली’, अशी टीका आंदोलनतकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली.

राजकीय नेत्यांना घातलेली गावबंदी खटकली, मराठा समाजाला चंद्रशेखर बावनकुळेंचा खास सल्ला
दानवे यांना काळे झेंडे

पिंपरी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) भेट देण्यासाठी आले असता, शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले; तसेच घोषणाबाजी केली.

शिवसेनेतही पडसाद

मराठा आरक्षणावरून शिवसेनेतही पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांकडून देण्यात येत असलेल्या नोटिसांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर साखळी उपोषण करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारल्याने सकल मराठा समाजाचे पदाधिकारी ठाण्यात आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणासाठी तरुणानं आयुष्य संपवलं, सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed