• Sat. Jun 13th, 2026

    मुख्यमंत्रीसाहेब शाळा बंद करू नका ! चिमुकल्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

    मुख्यमंत्रीसाहेब शाळा बंद करू नका ! चिमुकल्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब.. श्रीमान नमस्कार, पत्र लिहण्यास कारण की, आपण आमच्या शाळा बंद करू नका. आम्ही सर्व शेतकरी आणि गरीब मजुरांची मुले. शाळा बंद झाल्या तर आम्ही ओढे, नदी नाल्यातून खराब रस्त्यांनी दुसऱ्या शाळेत जायचे कसे? असा सवाल पत्रलेखनाद्वारे आसेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. इयत्ता दुसरी, तिसरीतील विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त प्रत्यक्ष पोस्टकार्डवर पत्रलेखन करून जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

    राज्यसरकाने जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारच्या ‘समूह शाळा’ निर्णयाचा राज्यभरात विरोध होत आहे. गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी टपाल दिनानिमित्त सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कैफियत मांडली. ज्या शाळा बंद होणार आहेत तेथील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचे, आपल्या पत्रात नमूद केले. प्रत्यक्ष पोस्टकार्डवर पत्रलेखन करून जिल्हा परिषद शाळा बंद करू नका, असे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

    Vande Bharat: इंदोर भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत धावणार, मध्य रेल्वेचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
    याबाबत शिक्षिका गितांजली साळुंके-हिवाळी यांनी म्हटले आहे, काळाच्या ओघात पत्रे इतिहासजमा होत असताना पत्र, पोस्टकार्डचे महत्व, पत्राचा मायना, पत्रलेखन याची माहिती प्रत्यक्ष कृती लेखनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने पोस्टकार्ड लेखनाचे आयोजन करण्यात आले होते. समाजमाध्यमांच्या जगात सुद्धा विद्यार्थ्यांनी पत्र लेखन अतिशय उत्तमपणे सादर करत आपल्या भावनांना यानिमित्त वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला.

    विजयानंतरही युवराज सिंगने टोचले भारतीय संघाचे कान, जे काही बोलला तो एकदम करेक्ट बोलला
    पत्रात काय लिहले..
    मुख्यमंत्रीसाहेब पत्र लिहिल्यास कारण की, साहेब आपण कमी पोरं असणाऱ्या शाळा बंद करणार आहात. जर या शाळा बंद झाल्या तर माझ्यासारख्याच त्या शाळांतल्या मुलांच्या शिकण्याचं काय होईल? विनंती आहे की, या शाळा बंद करू नका. जर या शाळा बंद झाल्याच तर तिथल्या पोरांना दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यातील छातीपर्यंतच्या पाण्यातून कसे जायचे? असे पत्रलेखनात विद्यार्थ्यांनी लिहल्याचे शिक्षकांनी सांगितले.

    राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला माहिती,जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed