Mumbai Rail Expansion: मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सहभाग भांडवल ५०० कोटींवर आळं असून महामुंबईत रेल्वेविस्ताराच लक्ष्य आहे. एमयूटीपी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
भांडवल वाढवण्यास मान्यता
मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली आहे. या कंपनीत रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात अनुक्रमे ५१:४९ या प्रमाणात भागभांडवल आहे. या महामंडळाकडून मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करणे, क्षमता वाढविणे, सुधारणा करणे आणि प्रवाशांना आधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पायाभूत विकास प्रकल्प राबविण्यात येतात. आता या महामंडळाकडे सोपविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आकार वाढत असल्याने खेळत्या भांडवलात वाढ करण्यासाठी महामंडळाच्या समभाग भांडवलात वाढ करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Multimodal Tunnel : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, BMC चा मल्टीमोडल बोगदे प्रोजेक्ट, पुढील 30 वर्षांच्या ट्राफिकनुसार स्ट्रॅटेजी
महामंडळामधील एकूण अधिकृत समभाग भांडवलापैकी भरणा केलेले समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून २२५ कोटी करण्यासही मान्यता देण्यात आली. या वाढीपोटी राज्य शासनाच्या हिश्याचे ९८ कोटी रुपयांचे योगदान देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ( एमआरव्हीसी ) ‘एमयूटीपी’ प्रकल्पसंचातून महामुंबईत रेल्वेमार्गांची क्षमता वाढवण्याचे प्रकल्प पूर्ण करण्यात येतात. ‘एमयूटीपी-१’ हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. एमयूटीपी २, ३, ३ अ आणि ३ ब या प्रकल्पांच्या माध्यमातून नवीन पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंतचा विस्तार, कल्याण ते आसनगाव / बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका यांसह अन्य महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
महामुंबईत एकूण ६४,६४४ कोटींची कामे
सद्यस्थितीत महामुंबईत ६४ हजार ६४४ कोटी रुपयांहून अधिक विकास कामे सुरू आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे ‘एमआरव्हीसी’च्या आर्थिक पायाभरणीला अधिक बळकटी मिळाली आहे. वाढीव भांडवली आधारामुळे महत्त्वाकांक्षी उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी, रेल्वे क्षमतावाढीला गती आणि मुंबईचे रेल्वेजाळे अधिक सुरक्षित, जलद व कार्यक्षम करण्यास मदत होईल. याचा लाभ लाखो प्रवाशांना मिळेल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार
मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत
मुंबई-पुणेदरम्यान लोणावळा ते कर्जत घाट मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेवरून पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास रवाना झाली. यामुळे मुंबई-पुणे घाटातील सर्व मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे ६ जुलै रोजी घाट रेल्वेमार्गात दरड कोसळण्यासह भूस्खलन झाले होते. त्यामुळे घाटातील तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक खंडित झाली. रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अकराशे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दिवसरात्र काम केल्यानंतर दोन मार्गांवरील प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. तिसऱ्या मार्गाखालील खडींसह जमीन वाहून गेल्याने त्याला वेळ लागला. हे काम सोमवारी रात्री पूर्ण झाले. त्यानंतर खंडाळा आणि मंकी हिल स्थानकांदरम्यानच्या अप मार्गावर पहिले इंजिन धावले.
