• Sat. Sep 21st, 2024
नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूतांडव तरी निर्लज्ज सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, आदित्य ठाकरे संतापले

छत्रपती संभाजीनगर: नांदेड येथे एवढे मृत्यू होऊनही सरकार काही तिथे पोहोचलेले नाही. सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आणि मनुष्यबळाची कमतरता असताना कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही आणि कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. अर्थात, राज्य सरकार निर्लज्जच आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्रीसाहेब शाळा बंद करू नका! चिमुकल्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (९ ऑक्टोबर) घाटीला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्याशी चर्चा केली. घाटीतील नेमकी परिस्थिती जाणून घेत औषधांच्या तसेच मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारी रुग्णालयांमध्ये होत असलेले मृत्यू ही गंभीर बाब आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता हे विषय सातत्याने समोर येत आहे. त्यामुळेच नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आलो आहे. नांदेड आणि नागपूरलाही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रश्नावरुन राजकारण करण्याची इच्छा नसून सरकारचे डोळे उघडणे हाच हेतू आहे. याच कारणास्तव २९ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढला होता. आता हाफकिन संस्थेऐवजी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी होणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्राधिकरणामार्फत हे काम अजूनही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे. मुळात प्राधिकरण स्थापन करण्यामागचा हेतुदेखील संशयास्पद आहे. पुन्हा जिल्हा नियोजन मंडळाचा निधीदेखील पुरेसा मिळत नसल्याची स्थिती असून विकेंद्रीकरणाची खरी गरज आहे. ज्या अधिष्ठातांच्या जबाबदारीवर अख्खे रुग्णालय चालते. त्यांना मनुष्यबळ भरतीचे तसेच इतर अधिकार देण्यात काय अडचण आहे, असाही प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवीमुक्त समाजासाठी अनोखा उपक्रम; आई-बहिणींचा अपमान रोखण्यासाठी सांगलीत अपशब्द न वापरण्याचं आवाहन

औषधांचा अपुरा पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता, यासारख्या प्रश्नांवर विकेंद्रीकरण हेच उत्तर आहे. हे सर्व प्रश्न अधिवेशवात उचलणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, नांदेड येथील खासदाराच्या स्टंटबाजीवरही त्यांनी टीका केली. खरं तर या प्रश्नी आम्ही मोर्चे, आंदोलने करू शकलो असतो, पण अशा प्रकरणांमध्ये चौकशी समिती नेमून कुणाला तरी निलंबित केले जाते. यामुळे खरे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळेच खरे प्रश्न आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed