• Sat. Sep 21st, 2024

धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी; ‘कृउबा’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे आदेश कोर्टाकडून रद्द

धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी; ‘कृउबा’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे आदेश कोर्टाकडून रद्द

Nashik APMC : कथित धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी होणार आहे. ‘कृउबा’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे आदेश कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे.

 

Nashik Agricultural Produce Market Committee (1)
धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित धान्यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत एक कोटी १६ लाख आर्थिक नुकसानीप्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहेत. याबाबत पणनमंत्र्यांनी पुन्हा सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पिंगळे गटाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी संचालक मंडळावर कथित धान्यवाटप घोटाळा, गाळे विक्रीत एक कोटी १६ लाखांचे नुकसान केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल झाली होती. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून बाजार समितीच्या संचालक मंडळाला दोषी ठरवून त्यांच्याकडून संबंधित खर्च वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, उपनिबंधकांचे हे आदेश पणन संचालकांनी रद्द केले होते. त्यावर पणनमंत्र्यांकडे पुन्हा अपिल दाखल झाले. त्यावर मुख्यमंत्री तथा तत्कालीन पणनमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावणी घेत पणन संचालकांचा आदेश रद्द करीत जिल्हा उपनिबंधकांना याबाबत कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार आदेश प्राप्त होताच जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणीचे आदेश काढत २५ मे रोजी सुनावणी ठेवली होती. यावर पिंगळे गटाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. न्यायालयात आपले म्हणणे मांडत मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांनी केलेला आदेश रद्द करताना कुठलेही ठोस कारण दिलेले नव्हते. असे असताना जिल्हा उपनिबंधकांनी लागलीच आदेशाची अंमलबजावणी करीत नोटीस काढणे अयोग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले.
नाशिकची कांदाकोंडी फुटली! व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे, आजपासून बाजार समित्यांत लिलाव सुरु
त्यावर उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत मुख्यमंत्र्यांनी केलेले आदेश व जिल्हा उपनिबंधकांनी तत्परता दाखवत काढलेल्या नोटिसा यावर स्थगिती दिली होती. या स्थगिती प्रकरणावर उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. त्याचे आदेश प्राप्त झाले असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात कुठलीही ठोस कारणे दिलेली नाहीत. परिणामी, हा आदेश टिकू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले आदेश रद्द करीत याबाबत पणनमंत्र्यांकडे पुन्हा सुनावणी व्हावी, असे उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे. पिंगळे गटाकडून उच्च न्यायालयात अॅड. प्रमोद जोशी, अॅड. किशोर पाटील, अॅड. निखिल पुजारी व अॅड. प्रतीक रहाडे यांनी बाजू मांडली.

टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed