• Wed. Jun 10th, 2026

    टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सिन्नर तालुक्यातील घटना

    टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सिन्नर तालुक्यातील घटना

    म. टा. वृतसेवा, सिन्नर : शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये एका दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन टवाळखोर तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

    काय घडलं?

    गेल्या दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करीत मुलींना त्रास देणाऱ्या गावातील तिघांबरोबर तिचा वाद झाला होता. या तिघांनी तिच्या घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट माहिती सांगून, तिच्या वडिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या टवाळखोरांना समज दिली होती. मात्र हे तीनही टवाळखोर शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या या विद्यार्थीनीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर त्यांच्या लक्षात आली. दरम्यान, दोडी येथील रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
    मित्राने दिला दगा नंतर सावकाराने छळलं; चिठ्ठीत कारण सांगत तरुणाची धक्कादायक एक्झिट, काय घडलं?
    यानंतर शहा येथील ग्रामस्थांनी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापूर्वी ठिय्या आंदोलन केले. यानंतर वैभव विलास गोराणे व अंकुश शिवाजी धुळसैंदर यांसह एका अल्पवयीन संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed