• Sat. Sep 21st, 2024

छ.संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर जलील रिंगणात हवेच: रावसाहेब दानवे

छ.संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर जलील रिंगणात हवेच: रावसाहेब दानवे

छत्रपती संभाजीनगर: भाजपकडून छ. संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांनी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. डॉ .भागवत कराड असू द्या किंवा आमचा भाजपचा कोणताही उमेदवार असो संभाजीनगरमध्ये निवडून येण्यासाठी आम्हाला एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना उभं करावंच लागतं, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यामुळे इम्तियाज जलील २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवतील, अशी व्यवस्था करावीच लागेल, असेही दानवे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झाला आहे.

तर दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणुका लढवेन, हर्षवर्धन जाधवांनी शड्डू ठोकला

छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये दिशा समितीच्या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री अब्दुल सत्तार,आमदार हरिभाऊ बागड, अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संकटात सापडेल्या मविआसाठी गूड न्यूज; विविध १३ पक्षांचा पाठिंबा, शेट्टींचीही दिशा ठरली?

यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरावर दोन्ही पक्ष सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड लोकसभेसाठी इच्छा व्यक्त करत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केला यावेळी उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की भागवत कराड हे जर का इच्छा व्यक्त करत असेल तर चुकीचं काय? बिना इच्छेच काही भेटत असतं का? छत्रपती संभाजी नगर लोकसभेसाठी भागवत कराड असू द्या किंवा आमचा भाजपचा कोणताही उमेदवार असो त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला एमआयएमच्या इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं, असे रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर शेजारी बसलेले इम्तियाज जलील हेदेखील खळखळून हसायला लागले. दानवेंच्या या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.

INDIA आघाडी जेव्हा आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार सांगेल, त्याच दिवशी शकले होतील : रावसाहेब दानवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed