#nanapatole #congress #mpscpaperleak #devendrafadnavis #bjpराज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, केवळ दादा भुसे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.