• Sat. Sep 21st, 2024

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कामात फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कामात फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत जून २०२२ मध्ये फूट पडल्यानंतर नीलम गोऱ्हे एका वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइच्या मटा कॅफे या विशेष कार्यक्रमात भाष्य केलं. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीत आणि नेतृत्व शैलती काय फरक जाणवतो असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी सविस्तरपणे त्यांची बाजू मांडली. “मुळामध्ये असं आहे की एकनाथ शिंदेंना पण स्वतःला असं बाळासाहेबांबरोबर स्वतःची तुलना करणं आवडणार नाही. कारण त्यात अगदी ते मनापासून एक शिवसैनिक किंवा कार्यकर्ते असल्यासारखेच आहेत ते नेतृत्व करतायेत बरोबर आहे, परंतु असं ते स्वतःला बाळासाहेबांचे अनुयायीच मानतात.” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

बाळासाहेबांचा दरारा होता…

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, शिवसेनेत प्रवेश करताना उद्धव साहेबांशी दोन अडीच तास बोलणं झालं होतं, चर्चा झाली होती. निर्णय झाला नव्हता त्यावेळी बाळासाहेबांशी बोलणं झालं. ते म्हणालेले पंतप्रधान मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि मग माझं नाव असतं सातव आठवं बाळासाहेब ठाकरे तसं तू फक्त माझं नाव समजतेस का? की बाबा मी फक्त त्या यादीपैकी एक आहे. मग तू काम का करणार नाहीयेस? मला कारण कळेल का? मी म्हटलं की मग नाही मग ठीक आहे. आता त्यांना नाही काय म्हणणं मला शक्य झालं नव्हतं. पण नंतर मला बाळासाहेबांनी फार म्हणजे फार सहकार्य दिलं. कधीपण त्यांना वेळ मागितली तर एक आठ दहा दिवसात वेळ मिळायची. बाळासाहेबांची भेट थोडक्यात असायची, लांबलचक चर्चा होत नसतं. पण आपल्याला काय शंका असतील, प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल ते बोलायचे, सांगायचे काही विरोध झाला असेल. तर ते पण मला म्हणायचे जाऊ दे तू लक्ष देऊ नकोस या गोष्टींच्याकडे, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी पेपरच्या बातम्यांची कात्रणं काढून ठेवलेली

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, एकदा तर मी भेटायला गेले तर त्यांनी मला जाताना सांगितलं की हे काय पाहिलं का तू? असं विचारलं, म्हटलं काय आहे? बातम्यांची कात्रणं आहेत. तुझ्या बातम्यांची कात्रणं बघ. किती बातम्या असतात तुझ्या? तर त्यांनी सगळ्या पीएला काढून ठेवायला सांगितले होते. आणि मला सांगितलं एवढ्या बातम्या तुझ्या असतात. तू पेपर वाचतेस किती? नक्की. मग मी सांगितलं मी एवढे सात आठ पेपर वाचते वगैरे ही देखील आठवण नीलम गोऱ्हे यांनी सांगितली.

बाळासाहेबांनी ज्यावेळेला प्रवक्ता केलं त्यावेळेलाही पेपर वाचतेस तर त्याचा नीट उपयोग कर असा सल्ला दिल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी प्रवकत्याची सार्वजनिक भूमिका आणि वैयक्तिक भूमिका ही वेगळी आहे असं शिवसेनेत चालणार नाही, असं सांगितलं होतं. जे काय असेल ती भूमिका सार्वजनिक म्हणूनच बोलायची असं त्यांचं मत होतं. त्यांची एक शैली होती कामाची, ते माझ्यावर कधी रागवले नाहीत, असं गोऱ्हे म्हणाल्या. कधीतरी एखादे संतप्त मनस्थिती असेल कोणाला भेटणार नसतील तर भेटले नाहीत असं सुद्धा झालं होतं पण बाळासाहेबांची शैली जी होती ती उघडउघड होती. ते विषयाचा तुकडा पाडायचे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
पावसाचा हाहाकार सुरूच! एकाच दिवशी तिघांचा बळी, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घरांचेही नुकसान

उद्धवसाहेब स्वभावाने अतिशय शांत आहेत. उद्धव साहेबांची कधी अशी भीती वाटली नाही. बाळासाहेबांचा दरारा होता, उद्धव साहेबांच्या बरोबर आम्ही मोकळेपणानं गप्पा मारायचो, बोलायचो. पण उद्धव साहेबांचं थोडसं असं आहे की त्यांनी एकदा ठरवलं की एखादा विषय बोलायचं नाही. तर ते नाहीच बोलत. मग तुम्ही कितीही करा. तुम्ही त्यांना पन्नास मेल पाठवा नाहीतर पाच मेल पाठवा नाहीतर दहा वेळा जा तिथे. तर तो विषय बोलतच नाही शेवटपर्यंत म्हणजे खरं सांगायचं तर न बोलणं. हे सगळ्यात मोठं हत्यार आहे त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे ते संवाद टाळून देतात, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
भारत आणि पाकिस्तानमधील फायनलचा सामना रविवारी किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ
आम्हाला आम्हाला या गोष्टीची सवय नव्हती अजिबात त्यामुळे खूप मनस्ताप व्हायचा, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मुख्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या शैलीत जो कामाचा फरक आहे ना त्याच्यामध्ये बाळासाहेब तुकडा तोडायचे एखाद्या विषयाचा आणि उद्धवसाहेब तसं न करता ती गोष्ट प्रलंबित किंवा त्या माणसाचा पेशन्स संपाव्या अशी ते वाट बघतात असा दोघात फरक आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
पुणे रायगडला जोडणाऱ्या वरंधा घाट बंदचे आदेश,वाहन चालक ऐकेनात..! अखेर रायगड जिल्हा प्रशासनाने केली अनोखी युक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed