• Mon. Aug 3rd, 2026
    टोकाचा निर्णय रागाच्या भरात नाही, पिंपरीतील कुटुंबाचे दोन महिनेआधी प्लॅनिंग, 1 जूनशी मृत्यूचं कनेक्शन

    Kerala family Pimpri Death : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कुटुंबाने अनेक दिवस याचा विचार आणि नियोजन केले होते. या घातक रसायनाविषयी त्यांनी इंटरनेटवर काय माहिती शोधली होती, याचा तपास सुरु आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहराला एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरवून सोडले आहे. मोरवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाने स्वतःच्याच घरात विषारी धुराचा वापर करत आपले जीवन संपवले. सुरुवातीला या घटनेत कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते, मात्र आता उपचारादरम्यान पत्नी आणि तरुण मुलीचाही दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच शोककळा पसरली आहे.

    मृत्यूचा वेदनादायी मार्ग

    शुक्रवारची रात्र ही पिल्लई कुटुंबासाठी शेवटची रात्र ठरली. मृत्यूला कवटळण्यासाठी या कुटुंबाने अत्यंत धक्कादायक मार्गाचा अवलंब केला आहे. रात्रीच्या वेळी घरात पेटत्या कोळशावर त्यांनी ‘सोडियम नायट्रेट’ नावाचे अत्यंत विषारी रसायन ओतले. यामुळे संपूर्ण बंद खोलीत एक प्रकारचा विषारी आणि जीवघेणा धूर पसरला. श्वासोच्छवासावाटे हा धूर शरीरात गेल्याने तिघेही बेशुद्ध पडले. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना उघडकीस आली.

    दोन दिवसांची झुंज अपयशी

    या भयानक घटनेत कुटुंबाचे प्रमुख विनोद पिल्लई यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, त्यांच्या ४५ वर्षीय पत्नी सिरजा आणि १९ वर्षांची मुलगी पौर्णिमा या दोघींना अत्यंत गंभीर अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात सलग दोन दिवस मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याची शर्थीची झुंज दिली, मात्र विषारी रसायनाचा प्रभाव इतका भयंकर होता की, रविवारी या मायलेकींनीही अखेरचा श्वास घेतला. या मृत्यूंसोबतच पिल्लई कुटुंबाचा कायमचा अंत झाला.
    Maharashtra TimesRohit Sharma : 17 व्या वर्षी उभारलेलं ‘चायवालाज्’ अचानक बंद, मग अध्यात्मात झोकून दिलं; युवा उद्योजक रोहित शर्मांचा चटका लावणारा शेवट

    उच्चशिक्षित कुटुंबाची दुर्दैवी अखेर

    या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे हे संपूर्ण कुटुंब अतिशय उच्चशिक्षित होते. कुटुंबाचे प्रमुख विनोद हे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या ‘आयआयएम, अहमदाबाद’ चे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पत्नी सिरजा या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘समन्वयक’ या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. त्यांची एकुलती एक लाडकी लेक पौर्णिमा ही कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती.

    दोन महिन्यांपूर्वीच ऑर्डर

    दरम्यान, संत तुकारामनगर पोलिसांच्या तपासात एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. हा निर्णय रागाच्या भरात किंवा क्षणिक नैराश्यातून घेतलेला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्लई यांनी तब्बल दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच १ जून रोजी, ऑनलाईन माध्यमातून ‘सोडियम नायट्रेट’ या प्रतिबंधित आणि अत्यंत घातक रसायनाची ऑर्डर दिली होती.

    Nana Patole Troll | भाजपकडून पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल, पाद्यपूजन करणारा कार्यकर्ता काय म्हणाला?

    याचाच अर्थ, हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी अनेक दिवस याचा विचार आणि नियोजन केले होते. या घातक रसायनाविषयी त्यांनी इंटरनेटवर काय माहिती शोधली होती, हे तपासण्यासाठी आता पोलीस सायबर सेलची मदत घेत आहेत. तसेच, सत्य पडताळून पाहण्यासाठी तिघांचेही मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

    शेवटची चिठ्ठी सापडली

    तर, घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक नोट लागली आहे. यात विनोद यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, “आम्ही स्वेच्छेने आमचे जीवन संपवत आहोत. हा निर्णय आम्ही केवळ आणि केवळ आर्थिक विवंचनेमुळे घेत असून, यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.”
    Maharashtra TimesCrime News : कॅब चालकाचे प्रवाशाशी प्रेमसंबंध जुळले, बायकोचा काटा काढला अन् तिच्यावरच खापर फोडलं, दोघं अटकेत
    मिळालेल्या माहितीनुसार, पिल्लई कुटुंब काही वर्षांपूर्वीपर्यंत नेहरूनगर भागात स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहायचे. मात्र, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे तीन वर्षांपूर्वी त्यांना ते घर विकावे लागले आणि तेव्हापासून ते मोरवाडीत एका भाड्याच्या घरात राहत होते. सततचा मानसिक ताण आणि डोक्यावर असणाऱ्या आर्थिक ओझ्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तरीही, यामागे कोणा सावकाराचा तगादा होता का? किंवा कोणाकडून त्यांच्यावर दबावाचा वापर करून मानसिक छळ केला जात होता का? या सर्व शक्यतांचा संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा