• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?

महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असले तरी अद्याप आमदारांच्या कोणत्या प्रश्नाला, कोणते मंत्री उत्तर देणार हेच निश्चित झालेले नाही. अधिवेशनाला जेमतेम तीन दिवस उरलेले असताना खातेवाटपाअभावी कोणत्या खात्याचे प्रश्न कोणाकडे द्यायचे, त्यांना माहिती कशी द्यायची, असा गहन प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांना पडला आहे. तर, दुसरीकडे अधिवेशनाचा कणा समजला जाणारा विरोधी पक्षनेताच अद्याप निश्चित नसल्याने जनतेच्या प्रश्नावर सरकारला नेमके कोण आणि कसे धारेवर धरणार, याबाबतही अनिश्चतता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेऊन जवळपास बारा दिवस होत आले, तरी अद्याप त्यांना खाती देण्यात आलेली नाहीत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम होत असते. आमदारांनी मतदारसंघातील; तसेच राज्यातील महत्त्वाच्या समस्यांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे असते. त्यासाठी जवळपास आठ ते दहा दिवस आधीपासून आलेल्या प्रश्नांवर विभागाकडून माहिती घेऊन उत्तर तयार केली जातात. ऐन वेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली जात असली; तरी संबंधित प्रश्नाला न्याय मिळावयाचा असेल, तर संबंधित मंत्र्यांना प्रश्नांचा सखोल अभ्यास करून मग काय उत्तर देण्याबाबत निर्णय घेता येतो. साहजिकच अधिवेशनाच्या दहा ते बारा दिवस आधी सर्व मंत्र्यांकडे अधिवेशनाच्या कामकाजाची लगीनघाई सुरू असते.
हर्षद मेहता अडकला अन् झुनझुनवालांची कारकीर्द बहरली, शेअर्स शॉर्ट करून केली नोटांची छपाई
अशा परिस्थितीत मंत्र्यांना खात्याचे वाटपच न केल्याने आता कोणी कोणत्या खात्याच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची, असा प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. मंत्र्यांनी शपथ घेतल्याने त्यांना खाती तर द्यावीच लागणार आहेत. त्यामुळे आता ज्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे ते मंत्रीही उत्तरांची तयारी करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत आहेत. शुक्रवारपर्यंत जरी खातेवाटप झाले तरी एवढ्या कमी वेळात प्रश्न समजून घेऊन त्यावर उत्तर देणे म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखेच ठरणार आहे.
Vande Bharat: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये थंडगार नाश्ता, जेवण; प्रवाशांच्या तक्रारीनंतर IRCTC चा मोठा निर्णय
अधिवेशनाला तीन दिवस उरले असताना कोण विरोधी पक्षनेता हेच अद्याप ठरलेले नाही. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने विरोधी पक्षनेतेपद सध्या रिकामे आहे. अधिवेशनाच्या काही दिवस आधीच विरोधी पक्षनेता सरकारचा भोंगळी कारभार, गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारी प्रकरणे शोधून काढतो आणि ती अधिवेशनात मांडतो. मात्र, अजून विरोधी पक्षनेत्याची निवडच झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्न मांडण्यासाठी ना विरोधी पक्षनेता ना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला अधिकृत मंत्री अशी सध्याची अवघड परिस्थिती आहे.

तुम्हाला लढण्यासाठी इतक्या जागा देऊ की, १५२ चा आकडा गाठता येईल; देवेंद्र फडणवीसांचा भाजप कार्यकर्त्यांना शब्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed