भाजपचे १०५ आमदार अन् १० मंत्री
भाजपचे महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेत १०५ आमदार आहेत. भाजपच्या १०५ आमदारांपैकी १० जण मंत्री आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४० आमदार त्यापैकी सध्या १० आमदार आहेत. आता नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यांना ९ मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यांच्याकडे किती आमदारांचं पाठबळ आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. आमदारांची संख्या आणि मंत्रिपदांची संख्या याचा विचार केला असता भाजपच्या मंत्र्यांच्या संख्येंची सरासरी कमी होते.
भाजपच्या १० मंत्र्यांपैकी दोघे मूळचे बाहेरचे
भाजपचे सध्याच्या मंत्रिमंडळात १० मंत्री आहेत. त्यापैकी राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेस मधून तर विजयकुमार गावित हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षात आलेले आहेत. त्यामुळं मूळच्या भाजपच्या आमदारांवर वाट पाहण्याची वेळ आलेली आहे.
राजकीय विश्लेषक बिरजू मुंद्रा यांनी तीन ते चार वेळा भाजपकडून आमदार असलेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. ते नेते २०१४ पासून मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती, असं म्हटलं. मविआची ताकद २०२४ पूर्वी कमी करण्यासाठी सध्याची खेळी झाल्याचं देखील ते म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांन त्याग करा, असं देखील म्हटलं होतं.
