• Sat. Sep 21st, 2024
Dhule Accident: ब्रेक फेल होऊन भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरला, ५ जणांचा जागीच चिरडून मृत्यू

धुळे : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदतकार्य सुरू झालेले आहे. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारता येणार नाही, कारण….; भाजपमधील सूत्रांची माहिती
हा अपघात इतका भीषण होता की, त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये हा कंटेनर घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

…तर शिंदे नव्हे, अजित पवार मुख्यमंत्री असते; शरद पवारांचं नाव घेत पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed