• Sat. Sep 21st, 2024
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात गुलाल उधळला; राज्यात पहिले खाते उघडले

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले आहे. गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाने सरपंच पदाचे पाहिले खाते उघडले आहे.

भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या सावखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या उमेदवार होत्या. निवडणुकीत सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.

सुषमा विष्णू मुळे यांच्या रूपाने भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्र राज्याच्या प्रथम सरपंच निवडून आल्याने पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये दमदार एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश होत. आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत बीआरएस चमकदार कामगिरी करणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील बी आर एस पक्षाचा पहिला सरपंच असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली. या निवडीबद्दल महाराष्ट्रभरातून भारत राष्ट्र समितीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी युवा नेते संतोष माने यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

बीआरएसचा महाराष्ट्रात राजकारणात प्रवेश

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रशेखरराव हेही आघाडीवर होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखरराव यांनी त्यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात प्रतिसादही मिळत आहे.

बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखरराव हे सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण चंद्रशेखरराव यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो की नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आम्हाला विचारा आमचा शेजारी कसाय?; विखे पाटलांचा समाचार घेत प्रभावती घोगरेंचं भाषण व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed