‘गेल्यावर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासोबत अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य १००१ टक्के खोटे आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.
महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
विनायक राऊत काय म्हणाले?
शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांच वक्तव्य.. बाकीचे तानाजी सावंत आंकाडतांडवानं बोलतात, तानाजी सावंताना बजेटचं मिळत नाही… त्यामुळं म्हणतात आगीतून फुफाट्यात पडलेलो आहे, असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे.. त्यामुळं आता भारतीय जनता पक्षानं शिंदे गटाच्या लोकांना ज्या पद्धतीनं नामोहरम करण्यास सुरुवात केलेली आहे.. शिंदे गटातील लोकांचा असंतोष एवढा उफाळून आलेला आहे. आमच्याकडे अनेक यामध्ये मंत्री असलेल्या लोकांनी सुद्धा उद्धव साहेबांकडे संपर्क साधायला सुरुवात केली आहे, असं विनायक राऊत म्हणाले. काही जणांनी प्रत्यक्ष आमच्यापैकी काही जणांशी बोलणं देखील सुरु केलेलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.