यावेळी त्या दोघांना तेथील हजर असलेल्या अशोक गोविंद कांबळे (रा. पाचर्डे) यांनी एकमेकांपासून वेगळे केले. रंगराव कांबळे व संजय साताप्पा कांबळे यांनी त्याच्या उजव्या हाताला दोरी बांधून त्यास गोविंद कृष्णा कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. त्यानंतर याची कल्पना पोलिस पाटील शिल्पा कांबळे यांना दिली आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान पहाटे पावणे तीनच्या सुमारास शुभंकर याने हाताला हिसडा मारुन तेथून अंधारातून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठलाग करू लागले. अंधारातून पळताना रस्ता ओलांडून पुढे जात असताना अंधारात विहीर न दिसल्याने शुभंकर हा धोंडीराम गोविंद लाड यांच्या शेतातील विहीरीत पडला आणि त्याचा पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिल्पा कांबळे (पाचर्डे ता. भुदरगड) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.
कोल्हापुरातल्या हुपरीची अनोखी कहाणी; अख्ख्या गावात घडते फक्त चांदी, गावकऱ्यांच्या बुद्धिकौशल्याची दाद