• Sat. Sep 21st, 2024

कर्नाटकातील मराठी भाषिकांना राज ठाकरेंचा खास संदेश, शेवटच्या क्षणी अनपेक्षित खेळीने ट्विस्ट

कर्नाटकातील मराठी भाषिकांना राज ठाकरेंचा खास संदेश, शेवटच्या क्षणी अनपेक्षित खेळीने ट्विस्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी जोर लावला होता. हा प्रचार येत्या काही तासांमध्ये थंडावणार आहे. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी एक अनपेक्षित खेळी केली आहे. राज ठाकरे यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. मराठी उमेदवारांनाच निवडून आणा, अशी साद राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना घातली आहे. येत्या १० तारखेला कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

राज ठाकरे यांनी त्यांच्या संदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, काय करायचं बघतो, कर्नाटकात फडणवीसांचं टीकास्त्र

मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

मोदींच्या दिशेनं मोबाईल भिरकावणारी महिला निघाली भाजप कार्यकर्ता; फोन फेकण्यामागचं कारण समोर

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

आपला

राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed