परभणी : सायंकाळच्या सुमारास पावसासह वादळी वाऱ्याने अचानक गोठ्यावरची पत्रे उडाले. पत्रे अंगावर पडून त्याखाली चिरडल्यामुळे सहा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील चुडावा शिवारामध्ये घडली आहे. गौरव रणखांबे असे अंगावर लाकूड पडून मृत्यू झालेल्या सहा वर्षीय बालकाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कळी उमलण्याआधीच बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने रणखांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील गौर, धनगर टाकळी, भाटेगाव, आडगाव , सारंगी, कंठेश्वर, चुडावा परिसरात अनेक ठिकाणी वादळी वारे व पावसाने काल संध्याकाळच्या सुमारास अचानक हजेरी लावली. त्यामुळे रणखांबे कुटुंबाने आपला बचाव करण्यासाठी शेतामध्ये असलेल्या गोठ्यामध्ये धाव घेतली. मात्र वादळी वाऱ्यामुळे गोठ्यावर असलेली पत्रे उडून गेले. त्यामुळे पत्र्याखाली लावलेला गोठ्यामध्ये असलेल्या गौरव रणखांबे या सहा वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडले. या घटनेमध्ये गौरव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. या ठिकाणी सहा वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वादळी वाऱ्यामुळे अंगावर लाकूड सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने रणखांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे चुडावा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. या ठिकाणी सहा वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वादळी वाऱ्यामुळे अंगावर लाकूड सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने रणखांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे चुडावा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अकोला, वाशिममध्ये चेंडूसारख्या गारा कोसळल्या, पिकांना झोडपलं, तोंडचं पाणी पळालं
बैलाच्या अंगावर झाड पडून मृत्यू
परभणीच्या पूर्णा तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे धनगर टाकळी या गावामध्ये झाडाला बांधलेल्या बैलाच्या अंगावर झाड कोसळून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे चुडावा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
