• Sat. Mar 14th, 2026
    करोनानं दोघांचा मृत्यू, सातारा जिल्हाधिकारी अ‍ॅलर्ट, मास्कसंदर्भात महत्त्वाचा आदेश काढला

    सातारा: जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. सोमवारी १२ जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी ३ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत ४५ जणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

    राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले.

    Fact Check : सातारा जिल्ह्याबाबतचे पालखी सोहळ्याचं ते वेळापत्रक अधिकृत नाही, माऊलींच्या चोपदारांची माहिती

    या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.

    IPLच्या लढतीपूर्वी चेन्नईच्या मैदानात रंगला वेगळाच सामना, अजिंक्य गालात हसू लागला तर…

    काय काळजी घ्यावी

    करोना आणि Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. सदर कोविड- १९ विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराचे अनुषंगाने ५० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड- १९ ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणांपूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

    आधी म्हणाले तू भारताचं भविष्य, मग म्हणाले तू ऑटो चालविण्याच्या लायकीचा, सिराजने हात जोडले!

    How To Do Matsyasana | मत्स्यासन करण्याची योग्य पद्धत | Maharashtra Times

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed