स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याला राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. 15 ऑक्टोबला एकही कारखाना सुरु होऊ देणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत चालू वर्षाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितावर गदा येणार असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर सरकारने शेतकऱ्यांना प्रतिटन 500 रुपये अनुदान जाहीर केले नाही, तर 15 ऑक्टोबरला एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यामुळे आगामी काळात राज्यात टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रिकव्हरीतील घटीमुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका
राजू शेट्टी यांनी या निर्णयामागील तांत्रिक आणि आर्थिक तोटे सविस्तरपणे मांडले आहेत. त्यांच्या मते, 15 ऑक्टोबरसारख्या लवकरच्या तारखेला साखर कारखाने सुरू केल्यास उसाच्या रिकव्हरीवर मोठा परिणाम होतो. पहिल्या एका महिन्यात उसाची रिकव्हरी जवळपास 1.25 टक्क्यांनी कमी भरते. रिकव्हरी कमी होणे म्हणजे साखरेचे उत्पादन कमी होणे आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उसाच्या दरावर होतो.
Gokul Election : ‘गोकुळ’च्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले, 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला होणार मतमोजणीया सव्वा टक्क्यांच्या घटीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन 350 ते 400 रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. इतकेच नाही तर, वर्षाची सरासरी रिकव्हरी खाली आल्यामुळे पुढील वर्षाच्या एफआरपीवर याचे गंभीर परिणाम होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
साखरेच्या तुटवड्याचा बनाव आणि व्यापाऱ्यांचे संगनमत
देशात साखरेचा साठा अपुरा असल्याचा बहाणा करून केंद्र सरकारने हा घाईघाईचा निर्णय घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. मुळात काही मोजक्या साखर कारखानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी सरकारला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली आहे. शेट्टी यांच्या दाव्यानुसार, आगामी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशाला पुरेल इतका साखर साठा शिल्लक आहे. केंद्र सरकार मोठ्या साठेबाजांवर किंवा कारखानदारांवर धाडी टाकण्याचे धाडस करत नाही, मात्र स्वीट मार्ट आणि छोट्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन ‘डोंगर पोखरून उंदीर’ शोधण्याचा प्रकार करत असल्याची टीका त्यांनी केली.
Amruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?
आयात धोरण आणि सरकारी अनुदानाची मागणी
साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आयात शुल्कात 20 टक्क्यांची कपात करून क्विंटलमागे 1,000 रुपयांचा महसूल बुडवला आहे. सध्या आयात केलेली साखर 5,500 रुपये प्रति क्विंटल दराने पडते, तर देशांतर्गत साखरेचे टेंडर 4,800 ते 5,000 रुपयांच्या आसपास आहे. जर सरकार आयातीसाठी तोटा सोसू शकते, तर मग रिकव्हरी कमी झाल्यामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला थेट 500 रुपये अनुदान देण्यास काय हरकत आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्तांचं खड्ड्यांवरुन चॅलेंज अन् दुसरीकडे इंदिरानगरमध्ये मुख्य रस्त्याला मोठं भगदाड
उत्पादनात 20 लाख टनांची घट होण्याची शक्यता
जबरदस्तीने 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू केल्यास यावर्षी देशाच्या एकूण साखर उत्पादनात किमान 20 लाख टनांची घट होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळप होणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 500 रुपये जमा करावेत, तरच आम्ही साखर कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करू, अन्यथा राज्यात साखर हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा