मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या जरांगेंवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी टीका केली आहे. मनोज जरांगे यांचं सुरू असलेलं आमरण उपोषण म्हणजे नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली. गणेशोत्सवानंतर आम्हीही मुंबईत आंदोलन करणार अशी घोषणा वाघमारेंनी केली आहे. वाघमारे यांच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेमुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.