• Fri. Sep 11th, 2026

Uday Samant : आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, मंत्री उदय सामंतांचे जरांगे पाटलांना आवाहन

मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्याचबरोबर मागण्या पूर्ण करतोय; हाक द्या आम्ही ओ देऊ, असं देखील सामंत म्हणाले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारची प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेले उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी, “जरांगे पाटलांच्या 13 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या असून त्यांनी उपोषण मागे घ्यावे, त्यांनी हाक दिल्यास आम्ही चर्चेला ओ देऊ,” असे स्पष्ट आवाहन केले.

“2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आरक्षण दिले. आरक्षण देणाऱ्या नेत्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग करणे योग्य नाही. कोणाबद्दलही वाईट वक्तव्य करू नये, अशी आमची विनंती आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी तपासण्यासाठी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत”, असं उदय सामंत म्हणाले.

हैदराबाद अन् सातारा गॅझेटवर कायदेशीर प्रक्रिया सुरू

शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सामंत यांनी स्पष्ट केले की, हैदराबाद गॅझेटची एसओपी तयार करण्यात आली आहे, तर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे कायदेशीर मत घेतले जात आहे. एसईबीसी प्रवर्गातून 3 लाख 50 हजार दाखले वितरीत करण्यात आले असून हे आरक्षण न्यायालयात टिकावे, हीच सरकारची भावना आहे. रद्द झालेल्या 4 प्रमाणपत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले असून ती न्यायालयीन बाब आहे.

Maharashtra TimesNarendra Bhondekar : महायुतीत नाराजीच्या चर्चा, शिंदेंच्या आमदाराला काँग्रेसची ऑफर, नरेंद्र भोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया

‘हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा, आम्ही चर्चेसाठी तयार’, प्रसाद लाड यांचं आवाहन

आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले की, काल रात्री जरांगे पाटलांशी फोनवरून संवाद साधला असून खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत, अशी विनंती केली आहे. पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात समाजात सुसंवाद राहावा, हीच आमची भूमिका आहे. आज जिल्हाधिकारी स्तरावर आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या जात प्रमाणपत्रांसंदर्भात विभागीय आयुक्तांसोबत विशेष आढावा बैठक होणार आहे.

Maharashtra TimesPM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

दरम्यान, मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे. ते 30 ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात त्यांचं उपोषण सुरु आहे. आता ही आरपारची लढाई असून आपलं शेवटचं उपोषण असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जोपर्यंत सरकार आपल्या पूर्ण मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

Maharashtra TimesGautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रारदुसरीकडे राज्य सरकारकडून वारंवार मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. पण जरांगे उपोषणावर ठाम आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात मागण्या मान्य न झाल्यास जरांगे मुंबईच्या दिशेला आंदोलन करण्यासाठी रवाना होण्याच्या तयारीत आहेत.