शेतातील कांदा आणला म्हणून भाऊ संतापल्याची घटना कर्जत तालुक्यातील राखसवाडी येथे घडली आहे. संतापलेल्या भावाने बहिणीच्या घरात घुसून कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : शेतातील कांदा आणल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने बहिणीशी वाद घालत तिला मारहाण केली. त्यानंतर दोन दिवसांनी बहिणी, त्यांचा मुलगा आणि नातेवाईक घरात असताना पुन्हा वाद उफाळून आला आणि लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने महिलांसह नातेवाईकांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील राखसवाडी खुर्द येथे घडला.
मारहाणीत महिलांना दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तुम्ही येथून निघून जा, पुन्हा येथे आलात तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अलका भाऊसाहेब चोरमले (वय ५०, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा; हल्ली रा. राखसवाडी खुर्द) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रामदास पिंगळे, रखमाजी विठ्ठल रुपनर, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा बापू कोळपे आणि रुपाली रुपनर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांद्यावरून सुरू झाला वाद
फिर्यादीनुसार, अलका चोरमले या पतीच्या निधनानंतर मागील काही वर्षांपासून राखसवाडी खुर्द येथे आई-वडिलांकडे राहत आहेत. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ रखमाजी विठ्ठल रुपनर हा कुटुंबासह शेजारी राहतो. ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता रखमाजी हा अलका यांच्या घरी आला. तू माझ्या वावरातील कांदे का आणलेस? असा जाब विचारत त्याने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तू येथे राहायचे नाही, येथून निघून जा असे सांगून तो निघून गेला.
Radha Patil : दहीहंडीचा कार्यक्रम राधा पाटीलच्या अंगाशी, नृत्यांगनेवर गुन्हा दाखल; काय घडलं?या प्रकाराची माहिती अलका यांनी आपल्या बहिणी, मुलगा आणि मेव्हण्याला फोनवरून दिली. ६ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास अलका यांना भेटण्यासाठी त्यांच्या बहिणी राधा किसन आखाडे, आशा रामचंद्र गोरे आणि मुलगा विकास भाऊसाहेब चोरमले हे घरी आले होते. याचवेळी रामदास पिंगळे तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. त्याला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने राधा यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर रखमाजी रुपनर याने आशा यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने पाठीत मारहाण केल्याचा आरोप आहे. राहुल पिंगळे याने नंदिनी हिला लाकडी काठीने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
महिलांसह मुलालाही मारहाण
आबा पिंगळे आणि बिरा बापू कोळपे यांनी महिलांसह विकास चोरमले यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी अलका यांचे चुलते आबा कृष्णा रुपनर आणि चुलती सुमलबाई मध्ये आले असता, रामदास पिंगळे याने आबा यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरातील वातावरण अक्षरशः तणावपूर्ण झाले. महिलांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
पुन्हा येथे आलात तर जीवे मारू अशी दिली धमकी
मारहाणीचा प्रकार सुरू असतानाच रुपाली रुपनर हिने तुम्ही येथून चालते व्हा, तुम्ही जर परत येथे आलात तर तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. कांदा आणण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण, घरात घुसून हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने राखसवाडी खुर्दमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा