• Thu. Jul 23rd, 2026

    पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार

    पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार

    Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोरदार कमबॅक झाला असून सर्वत्र मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबई, पुणे, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात हवामान विभागाने २३ जुलै रोजी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: जून महिन्यात पावसाने सगळ्यांना वेठीस धरले; पण जुलैमध्ये शहरात बरसलेल्या सरींनी बुधवारी बारा वर्षांचा विक्रम मोडला आहे. पुण्यात एक ते २२ जुलै सकाळी साडेआठपर्यंत ४५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी जुलै २०१४मध्ये २८२.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. महिना संपण्यासाठी अजूनही आठ दिवस शिल्लक असून, या हंगामात एक जूनपासून ५१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पोषक वातावरण असल्याने शहरात अजून चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

    बंगालच्या उपसागरालगत आणि आंध्र प्रदेशाच्या वरच्या काही भागांत हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तेथून अरबी समुद्रातपर्यंत पसरलेल्या द्रोणीय रेषेमुळे महाराष्ट्रातील मान्सून सध्या सक्रिय आहे. प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो आहे. पुण्यात शहर आणि जिल्ह्यातही रविवारपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळनंतर पावसाने जोर धरला. बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये आकाश ढगाळ होते, दुपारी बाराच्या दरम्यान मोठी सर आली आणि त्यानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

    Maharashtra TimesMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस पावसाचं तांडव, हवामान खात्याचा ताजा अंदाज

    घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस पडला. ताम्हिणीमध्ये २४ तासांत (बुधवारी सकाळपर्यंत) २७५ मिमी, भिरा येथे ३०९, लोणावळ्यात १४२, मुळशीमध्ये १५१ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हा आणि धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम होता. पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.

    घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’

    पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर गुरुवारी दिवसभरात जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने ‘आयएमडी’ने घाट परिसरात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे.

    मुंबई आणि कोकणात काय परिस्थिती?

    मुंबई आणि ठाणे शहराला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. तो आता यलो करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. ४०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

    पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये काय स्थिती ?

    सातारा जिल्ह्यातही आज पाऊस थैमान घालणार असून घाटमाथ्याच्या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वर आणि लगतच्या भागांमध्ये गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पूर्व भागात पावसाचा जोर कमी राहील. दरम्यान, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Weather : पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय

    उत्तर महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती?

    नाशिकमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात सर्वत्र जोरदार सरी बरसत आहेत. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.

    मराठवाडा आणि वदर्भात हवामान कसं असेल?

    छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात अखेर पावसाचा जोर वाढणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा