• Thu. Jul 23rd, 2026
    पुणेकरांना दिलासा मिळणार, मुसळधार पावसानंतर शहरातील पाणीकपात रद्द; वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

    Pune Water Cut: एल निनोची शक्यता आणि जून महिन्यात निर्माण झालेल्या पावसाच्या तुटीमुळे पुण्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पण गेल्या काही दिवसांत पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात; तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २० ‘टीएमसी’हून अधिक पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नसल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शहरात सध्या कोणतीही घोषित अथवा अघोषित पाणीकपात लागू नसून, नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

    महापालिकेकडून नियोजनबद्ध पद्धतीने पुरवठा सुरू

    महापौरांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा, वितरण व्यवस्था आणि पाणीपुरवठा यंत्रणेचा महापालिकेकडून नियमित आढावा घेतला जात आहे. शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कुठेही तांत्रिक अडचण किंवा जलवाहिनी गळतीची घटना घडल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जात असल्याचा दावाही महापौरांनी केला. मान्सून सुरू असला, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    Maharashtra TimesWeather Update: पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार

    पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यानंतर १५ जूनपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांच्या आगमनापूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करण्यात आला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने पाणीकपातीचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे नागरिकांनाही काही काळ दिलासा मिळाला होता.

    ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्या शहराबाहेर पडल्यानंतर पाणीकपात १५ जुलैपासून पुन्हा पूर्ववत करण्याचे सुतोवाच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले होते. त्यानंतर महापौरांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करून पाणीकपातीचा निर्णय आठवडाभर स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते.

    धरणांत पुरेसा पाणीसाठा

    यंदा धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन ‘टीएमसी’ने कमी असला, तरी सध्याच्या परिस्थितीत धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात करण्याची आवश्यकता भासत नसल्याचे चित्र दिसते आहे. “पुणे शहरात सध्या कोणतीही अथवा पाणीकपात करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पाण्याचा वापर जबाबदारीने करावा,” अशी माहिती पुण्याच्या महापौर मंजूषा नागपूरे यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesST Bus: एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशाला कात्री; दीड वर्षांत दोनदा भाडेवाढ, तिकीट किती टक्क्यांनी वाढलं?

    वर्षभराच्या पाण्याची मिटली चिंता

    गेल्या चोवीस तासांत खडकवासला वगळता उर्वरित धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात दोन अब्ज घनफूट (टीएमसी) वाढ झाली आहे. प्रकल्पात आतापर्यंत २०.१६ ‘टीएमसी’ इतका पाणीसाठा जमा झाल्याने पुणेकरांच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. दरम्यान, धरण प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा जमा झाल्यास विसर्ग करण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण प्रकल्पात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत आणि अन्य धरणांची पातळी वाढली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा