Maharashtra Monsoon: 6 जून रोजीच तळकोकणात दाखल झालेला मान्सून दक्षिण महाराष्ट्रातच रखडला आहे. आधी 10 मग 15 जून आणि आता तर थेट 25 जूननंतर मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: यंदा मान्सून 25 जूननंतरच दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून तिथेच रेंगाळला असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. मुंबईत येत्या काही दिवसांत तापमान दमट आणि उष्णच राहणार असल्यामुळे मुंबईकरांना काही लवकर दिलासा मिळण्याची शक्यता नाही आहे.
11 जूनपर्यंत दाखल होतो मान्सून
नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत नेहमी 11 जूनदरम्यान दाखल होतो. पण आता 19 तारीख उजाडली असली तरी मान्सून काय, पूर्व मान्सूनच्या सरींचाही पत्ता नाही. गेल्या दोन दशकांमध्ये मान्सूनला इतका उशीर झाला पहिल्यांदाच झाला आहे. केरळमध्ये मान्सून 4 जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर दोन दिवसांतच, 6 जूनपर्यंत तळकोकणात दाखल झाला. पण त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस रखडला आहे.
Maharashtra Weather : पावसाची वाट पाहता पाहता महाराष्ट्रात वाढला उष्णतेचा पारा; 17 जिल्ह्यांना अलर्ट
आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या अबावामुळे मान्सूनला चालना मिळत नाही आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी आर्द्रतेचं स्त्रोत म्हणून काम करणारे पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरून वाहणारा विषुववृत्तीय प्रवाह गेल्या काही दिवसांपासून कमकुवत झाला आहे. यापूर्वी मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाचा जोर वाढला होता. मात्र गेल्या आठवड्याभरापासून हा वेग मंदावला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय नैऋत्येकडून वाहणारे वारेही कमकुवत झाले आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम झाला असून आर्द्रयुक्त वाऱ्यांचा प्रवाह येथे कमी झाला आहे.
विलंबाचं कारण काय?
हिंदी महासागरात तयार होणारं मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO)मुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीवर मोठा परिणाम होतो. एमजेओ 4-5 मीटर प्रति सेकंदाच्या वेगाने पूर्वेकडे प्रवास करतं. 30 ते 60 दिवसांच्या आत हवामानात मोठे बदल घडवून आणू शकतं. भारतातीस मान्सूनही या एमजेओमुळे प्रभावी होऊ शकतं. पण सध्या एमजेओ सारख्या प्रणालीसुद्धा मोसमी वाऱ्यांच्या हालचालींना चालना देत नाहीत. 2025मध्ये तब्बल 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच 26 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. यावेळी एमजेओमुळेच मान्सूनला वेग मिळाला होता.
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट? EL Nino Effect in India
गेल्या दोन दशकांमध्ये मुंबईमध्ये 9 वेळा मान्सूनला विलंब झाला होता. 2019 आणि 2023मध्ये सर्वात उशीरा, म्हणजे 25 जून रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यापाठोपाठ 2009मध्ये जून 21 रोजी मान्सून दाखल झाला होता. जर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर यंदा 25 जूनची तारीख ओलांडून हा दोन दशकांतील सर्वात उशीराने दाखल झालेला मान्सून ठरणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा