नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिलंजमाई झाली असली तरी शिवसेना मात्र अलिप्त दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी देखील या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. कोळशाच्या खाणीत हात काळे करून घेण्याची ईच्छा नाही, त्यामुळे निवडणुकी पासून आपण दूर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. विधान परिषदेची निवडणूक ही सामान्य माणसासाठी राहिली नसून धनधांडग्याची निवडणूक झाली आहे. यात पैशांचा मोठा बाजार सुरु असल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला.