Central Railway: मुंबईतील लोकलमधील प्रवाशांचे अनेकदा ट्रेन आणि फलाटांमधील अंतरामुळे अपघात होतात. त्यामुळे फलाटांची उंची वाढवून अंतर कमी करण्याची मागणी केली जात होती. आता मध्य रेल्वेने या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने २४ जुलै रोजीच्या अंकात ‘पोकळी ही जीवघेणी’ या मथळ्याखाली मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील लोकल आणि फलाटांमधील धोकादायक अंतराचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) यांना या समस्येकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ‘फलाटांची उंची वाढविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत’, अशी माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) यांनी दिली. यामुळे आता सात रेल्वे स्थानकांतील एकूण २० फलाट उंच होणार आहेत.
Mumbai Local: महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास
‘भायखळ्यातील सर्वच फलाटांवर ही समस्या जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांच्या सुरुवातीच्या भागातही लोकल आणि फलाटामधील अंतर खूपच जास्त आहे. त्यामुळे गाडीतून चढणे-उतरणे धोकादायक ठरते. गुडघ्यांचा किंवा पायांचा त्रास असलेल्या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो’, असे प्रवासी मोहन काळे यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अनेक स्थानकांवर लोकल आणि फलाट यांच्यातील पोकळीची समस्या गंभीर आहे. मात्र, सध्या केवळ सात स्थानकांतील २० फलाटांवरील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘सात स्थानकांतील प्रवाशांचीच सुरक्षा महत्त्वाची आहे का? उर्वरित स्थानकांतील जीवघेणी पोकळी कधी कमी होणार?’, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ठोस कालबद्ध आराखड्याची गरज
मध्य रेल्वेने या गंभीर प्रश्नाची दखल घेतली असली, तरी ही केवळ सुरुवात ठरू नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. फलाट आणि लोकलमध्ये धोकादायक अंतर असलेल्या सर्वच स्थानकांचे सर्वेक्षण करून, टप्प्याटप्प्याने नव्हे तर ठोस कालबद्ध आराखडा तयार करून ही समस्या कायमची दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Pune News: पुण्यात सार्वजनिक वाहतुकीला गती, उन्नत मार्गावर मेट्रोसारखी वेगवान E-RTS यंत्रणा, खाली वर्तुळाकार मार्गाने कोंडी फुटणार
‘मेमू’ घसरल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत
पश्चिम रेल्वेवरील गुजरात राज्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळ डाऊन मार्गावर विरार-भरूच मेमू रुळांवरून घसरल्याने सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे चार ते पाच तास विस्कळीत झाली. या घटनेमुळे गुजरात, राजस्थान आणि दिल्लीकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, पॅसेंजर आणि मेमू गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. विरार स्थानकातून पहाटे ४ वाजता सुटलेली विरार-भरूच मेमू नियोजित वेळेत रवाना झाली. मात्र, सकाळी ६च्या सुमारास भिलाड स्थानकाजवळ पोहोचल्यावर ती अचानक रुळांवरून घसरली. त्यामुळे डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक कोलमडली. परिणामी, नोकरदार, विद्यार्थी आणि कामगारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.
