Lift Ban On Liquor In Gadchiroli: दारुबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात विषारी दारूमुळे वीसपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेल्यानंतर दारुबंदीचा विषय ऐरणीवर आला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीची दारू अधिकृत करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी दारुबंदीबाबत मत व्यक्त केले आहे. ‘गेल्या ४० वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. परंतु, या बंदीने काहीही साध्य झालेले नाही. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र, तिथेही दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. गडचिरोलीत आता उद्योग येऊ लागले आहेत. या ठिकाणी रोजगारनिर्मिती होत आहे. त्यामुळे दारुबंदी कायम ठेवून काहीही साध्य होणार नाही,’ असे आत्राम म्हणाले.
Adhik Maas : भाविकांच्या देणगीतून साकारले 750 किलोचे सिंहासन, अधिकमासात टेकडी गणपतीला भव्य सुवर्णसाज
‘गरीब आदिवासींना महागडी दारू घेऊन प्यावी लागते. त्यामुळे ही बंदी उठवा. मोहाच्या दारूला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळी मोहाची दारू लोक पितात,’ असेही आत्राम म्हणाले.
नागपुरात Atul Londhe यांनी उमेदवारी अर्ज भरला, पहिली प्रतिक्रिया काय?
‘दारुबंदीमुळे व्यसनमुक्ती होत नाही’
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही आत्राम यांना पाठिंबा दिला आहे. ‘मी चंद्रपुरातील दारूबंदी उठवली. जगात आणि देशात दारू विक्री सुरू आहे. ज्या राज्यांनी दारूबंदी केली त्यांनाही ती उठवावी लागली. गडचिरोलीत आदिवासी व्यक्तींना मोहफूल दारू पाडून पिण्याचा अधिकार आहे. दारूबंदीमुळे माणूस व्यसनमुक्त होणार नाही. त्यामुळे यावर होणारी चर्चा ही फालतू चर्चा आहे. विकसित देशांमध्ये या गोष्टीला पूर्णतः मोकळीक आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मागणीला माझे समर्थन आहे,’ असे वडेट्टीवार म्हणाले.
