• Fri. Jun 5th, 2026
    Weather Update: पाऊस पडला, उष्मा कायम! नागपूर देशात पाचवे उष्ण शहर; 46.4 अंश सेल्सिअसची नोंद

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: शहराच्या काही भागांत दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. आता वातावरणात गारवा येईल, असे वाटत असतानाच पुन्हा कडक ऊन पडले, अन् उष्मा कायम राहिला. नागपूरकरांच्या आशेवर पाणी फेरले गेले.

    शहरासह विदर्भात गुरुवारीही उष्णतेची तीव्र लाट कायम राहिली. अनेक जिल्ह्यांतील कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. नागपुरात कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर वर्धा येथे ४६.८ अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दुपारच्या सुमारास शहर अक्षरशः तापले होते. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, संध्याकाळी शहरात झालेल्या पावसामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, तो काही वेळच टिकला.

    Weather Update : उष्णतेच्या झळा आता कमी होणार, विदर्भासाठी दिलासादायक बातमी
    दिवसभर शहरात चांगलेच उन्ह तापले. याखेरीज गोंदिया येथे ४६.१, चंद्रपुरात ४५.४ तर अमरावती व ब्रह्मपुरी येथे ४५.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, संध्याकाळी नागपुरातील बेसा, नंदनवन या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने काही काळ समाधानाची स्थिती होती. तसेच संध्याकाळी शहरातही काहीसा आल्हाददायक वारा सुटला होता. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला. त्यातच आता हवामान विभागाने शुक्रवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तरीसुद्धा उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली. थंड पेये, फळांचे रस आणि आइस्क्रीम विक्रेत्यांकडे मात्र नागरिकांची गर्दी वाढली होती.

    आजपासून दिलासा?
    गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. आता उष्णतेची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत असून, अकोला, वाशीम आणि भंडारा वगळता इतर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून पुढील चार दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesLockdown News: देशात लॉकडाऊन लागणार, पेट्रोल १७० रुपयांवर पोहोचणार; काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी, सरकारवर हल्लाबोल
    कुठे यलो अलर्ट?
    अकोला, वाशीम आणि भंडारा वगळता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुढील चार दिवस वादळी पाऊस आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    Maharashtra TimesChandrashekhar Bawankule: सपकाळांना राज्यात फिरु देणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, असं का म्हणाले?
    पाच दिवसांत उष्माघाताचे २२ बळी
    वाढत्या उन्हामुळे शहरात गेल्या पाच दिवसांत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी काही नवतपा राहणार असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, जिल्हा व रेल्वे स्थानकावरील मृत्यूची संख्या बघितली तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंभाजी मार्गावरील पुलाखाली ४५ वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. तर यशोधरानगर हद्दीतील भिलगाव येथील परशुराम चौकात शारदा को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिसरातील निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावर ३५ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतांची ओळख पटलेली नाही. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यापूर्वी २४ ते २७ मे दरम्यान शहरात रोज पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसदप्तरी आहे. या सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed