दिल्लीतील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देत धाराशिवमधील तरुण, नागरिक रस्त्यावर उतरलेले. कृषी उद्योजक रविराज साबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. साबळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासोबतच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याची राजीनामा घ्यावा असा हल्लाबोल केला.